• Sat. Sep 21st, 2024
गुंडांचा नंगानाच, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, संयमी बाळासाहेब कडाडले, सरकारला सुनावले

अहमदनगर : ‘सध्या राज्यात आणि देशात गुंडाचे राज्य असल्यासारखे वातावरण आहे. सत्ताधारी पक्षातील लोक गोळीबार करतात, दिवसा ढवळ्या वकील पती-पत्नीचा खून होतो. रोजच असे प्रकार घडत असतील आणि सरकार म्हणून सत्ताधारी काहीच भूमिका घेत नसतील तर देशात आणि राज्यात गुन्हेगारावर कोणाचाच धाक राहिला नाही असे दिसते. जनता भयभीत झाली आहे. ईडी, पोलिस, सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्थाचा वापर करुन विरोधकांनी अडचणी आणले जात आहे. अशा परिस्थितीत आता जनेतेलाच आवाज उठवावा लागेल,’ अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हतबलता व्यक्त केली. ‘मात्र, यावर आता जनताच न्याय करणार असून काहीही झाले तरी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

राहुरीतील वकील पती-पत्नीच्या हत्येच्या निषेधार्थ आणि वकिलांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील वकिलांना आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यासाठी थोरात नगरला आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
चार दिवसांपूर्वीच मॉरीस आणि एकनाथ शिंदेंची भेट, पक्षप्रवेशाचं आमंत्रण, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
थोरात म्हणाले, मुंबईत भाजपच्या आमदारांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यावर गोळीबार केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. खरे तर त्यात काय तथ्थ आहे, हे जनतेला कळले पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे. जर एखाद्याचा नेत्यासोबत फोटो येत असेल तर ते होऊ शकते. कारण अनेक लोक भेटतात, त्यांना प्रत्येकांना तपासणे शक्य नसते. पण जवळचा गुन्हेगार असेल तेही गांभीर्याने घेतले पाहिजे.

राज्यात गुन्हेगारावर कोणाचाच धाक राहिला नाही. जनता भयभीत झाली आहे. ईडी, पोलिस, सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्थाचा वापर करुन विरोधकांनी अडचणी आणले जात आहे. चूक असेल तर चूक म्हटले पाहिजे, मात्र एकतर्फी गुंतवण्याचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे कारवाई झालेले तिकडे गेले की त्यांच्यावरील आरोपाची फाईल सापडत नाही, याला काय म्हणायचे? असा सवालही त्यांनी विचारला.

जनतेच्या हितासाठी पक्षांतर केल्याचे सांगणाऱ्यांनी कशासाठी पक्षांतर केले हे सगळ्यांना माहिती आहे. स्वार्थ साधून एकत्र आलेल्यांना त्यांचाच ताळमेळ नाही. महत्वाच्या व जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यावर सरकारकडून अन्याय होत आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेना पक्षाबाबत निर्णय देताना तो राजकीय हेतून निर्णय घेतला आहे. जनता न्याय करेलच, पण अशा प्रवृत्ती विरोधात त्यांना आवाज उठवावा लागेल. इंडिया आघाडीत जागा वाटपाचे काम सुरु आहे. किती जागा मिळतील त्यापेक्षा जेथे सक्षम उमेदवार आहे त्यांना जागा देण्याचा विचार सुरु आहे, असेही थोरात म्हणाले.

बायकोने लग्नाचा किस्सा सांगितला, बाळासाहेब थोरातांसह नेते, उपस्थित मंडळी पोट धरुन हसले!

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. सध्या आरक्षणासंबंधी जी आंदोलने आणि वक्तव्य होत आहेत, त्यामुळे समाजात कटूता निर्माण होत आहे, असेही थोरात म्हणाले. आमदार लहु कानडे, कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, नूतन जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed