• Sat. Sep 21st, 2024

प्रभू आले मंदिरी: शिवाजीनगरमधील राम मंदिर, श्री जंगली महाराजांच्या आज्ञेने झालेली स्थापना

प्रभू आले मंदिरी: शिवाजीनगरमधील राम मंदिर, श्री जंगली महाराजांच्या आज्ञेने झालेली स्थापना

पुणे : भांबुर्डे म्हणजेच शिवाजीनगरचे ग्रामदैवत असलेल्या रोकडोबा मंदिराच्या बरोबर समोरच जुने श्रीराम मंदिर आहे. मंदिराचे जुन्या वाड्याच्या शैलीतले बांधकाम असून, आतमध्ये सभामंडप आहे. आतील बाजूस असलेल्या गाभाऱ्यात संगमरवरी श्रीरामाची मूर्ती लक्ष वेधून घेते. शिवाजीनगर परिसरासह पुणेकरांची या रामावर मोठी श्रद्धा आहे.

सद्गुरू श्री जंगली महाराजांच्या आज्ञेप्रमाणे महाराजांच्या मुख्य शिष्या रखमाबाई गाडगीळ ऊर्फ आईसाहेब यांनी येथे श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी श्री रोकडोबा देवालयासमोरची जागा २७ फेब्रुवारी सन १८९९ रोजी खरेदी केली. या ठिकाणी श्रीरामाचे नवीन देवालय बांधण्याचे काम सुरू करून गाभाऱ्याचे काम झाल्यावर पितळी मूर्तींची स्थापना केली. यानंतर सोयीप्रमाणे मंदिराच्या शिखराचे काम, सभामंडप व दरवाजा व अन्य काम केले. या मंदिरालगत पश्चिमेस व पूर्व बाजूस नवीन जागा घेऊन अकरा खणी सोपा पडवीसहित बांधकाम केले आहे. या कामासाठी १६ नोव्हेंबर १९०९ रोजी आईसाहेब यांचे चिरंजीव धोंडो रामचंद्र गाडगीळ यांनी ७०० रुपये दिले, अशी नोंद येथील पुस्तकात आढळते. यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करताना सुबक संगमरवरी मूर्ती घडवून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्यासह श्रीरामांच्या पायाशी हनुमंताची मूर्ती आहे. मात्र, आईसाहेबांनी बसवलेली मूळ पितळी मूर्तीदेखील येथे ठेवण्यात आली असून, तिचीही नित्यनेमाने पूजा केली जाते.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार ठाम, जरांगे यांनी आंदोलन स्थगित करावे, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन
‘ग्रामदेवता रोकडोबा मंदिरासमोरच असलेले हे श्रीराम मंदिर शिवाजीनगर परिसरातील ग्रामस्थांसह पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे,’ असे स्थानिक रहिवासी परीक्षित शिरोळे यांनी सांगितले. सोमवारी अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने मंदिरात आंनदोत्सव साजरा होणार असून, परंपरेप्रमाणे जंगली महाराज मंदिरापर्यंत नगरप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे.
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी विराट कोहली अयोध्येत दाखल; पाहा कोणकोणते खेळाडू पोहोचले

रामनवमीचा मुख्य उत्सव

‘श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि श्री जंगली महाराज भजनी मंडळाच्या माध्यमातून मंदिराचे कामकाज चालते. रामनवमीच्या आठवडाभर आधी भजनी मंडळातर्फे रोज रात्री भजनाचा कार्यक्रम होतो. मंदिरात दैनंदिन पूजा अर्चा व्हावी, यासाठी इथेच पुजाऱ्यांची निवासव्यवस्था केलेली आहे. मंदिराचे शिखर व त्यावर सोन्याने मढवलेला कळस एप्रिल १९१४मध्ये बसविण्यात आला. दर वर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळाच्या दिंडीसह रात्री १० ते पहाटे ६.०० वाजेपर्यंत छबिना व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात येते. यासाठी पितळी मूर्ती जंगली महाराजांच्या मंदिरात नेली जाते. या छबिन्यादरम्यान संत ज्ञानेश्वरांसह अन्य संतांचे अभंग संत एकनाथांचे एकनाथी भारूड, गवळणी म्हटल्या जातात, ही प्रथा आईसाहेबांनीच घालून दिली आहे,’ असे अॅड. स्वप्नील जोशी यांनी सांगितले.
राम मंदिरासाठी करा दान अन् टॅक्स वाचवा; कुठे, कसे करावे दान आणि कसा मिळेल लाभ, जाणून घ्या
Read Latest Maharashtra News And Marathi News

प्रसाद पानसे यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed