• Sat. Sep 21st, 2024

कामोठ्यातील पर्यटकांना काठमांडूत ठेवले डांबून, फडणवीसांचं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र अन् अशी झाली सुटका

कामोठ्यातील पर्यटकांना काठमांडूत ठेवले डांबून, फडणवीसांचं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र अन् अशी झाली सुटका

म. टा. वृत्तसेवा, पनवेल: पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या कामोठ्यातील ५८ पर्यटकांना काठमांडूत डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सीने काठमांडूतील ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले. थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून पर्यटकांनी स्वतःची सुटका केली.

कामोठे गावात राहणारे ५८ नागरिक १६ डिसेंबर रोजी उत्तर भारतात पर्यटनासाठी गेले होते. उत्तर प्रदेशातील लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेऊन हे प्रवासी बसने २३ डिसेंबर रोजी काठमांडूत पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर काठमांडूतील राधाकृष्ण टूर्स ट्रॅव्हल्सने यात्रा ट्रॅव्हल्स एजन्सीकडून तुमचे पैसे आमच्यापर्यंत पोहोचले नसल्याचे सांगत, तुम्ही आधी पैसे द्या, अन्यथा आम्ही इथून तुम्हाला जाऊ देणार, असे सांगून दमदाटी करण्यात सुरुवात केली. आम्ही सर्व पैसे भरलेले आहेत, अशी विनवणी करूनही हॉटेल व्यवस्थापन आणि राधाकृष्ण टूर ट्रॅव्हल्स व्यवस्थापन ऐकायला तयार नव्हते.

अग्निशमन दलाचे जवान रांगत-रांगत वर पोहोचले, समोर कोळसा झालेले सहा मृतदेह अन् कुत्रा
३५ महिला आणि २३ पुरुषांचा सहभाग असलेल्या सर्वांना पैशासाठी काठमांडू येथील अंकीत जायस्वाल याने एका रूममध्ये डांबून ठेवले. तब्बल सहा लाख कुठून जमा करायचे, या विचाराने तसेच, पूर्ण पैसे भरूनही ही अवस्था झाल्यामुळे सर्वजण घाबरले होते. त्यातील एक पर्यटक संजय म्हात्रे यांनी त्यांच्या मुंबईतील मित्राला फोनवरून संपर्क साधून मदत मागितली असता, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोबाइल क्रमांक दिला. म्हात्रे याने त्या नंबरवर मेसेज पाठवून घडलेला प्रकार सांगितला.

फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. सर्व यंत्रणांना कामाला लावून पर्यटकांची सुखरूप सुटका केली. गोरखपूरला तर प्रयागराजचे जिल्हाधिकारीही या पर्यटकांना भेटण्यासाठी आले असल्याची माहिती पर्यटक संजय म्हात्रे यांनी दिली. मुंबईपर्यंत नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून मदत मागितल्यामुळे या पर्यटकांसाठी विशेष बोगी जोडून मुंबईला पाठविण्यात आले. दोन दिवसांच्या प्रवासानंतर कामोठ्यातील सर्व नागरिक २८ तारखेला सुखरूप पोहोचले.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

माजी नगरसेविकेचा समावेश

काठमांडूत अडवणूक झालेल्या पर्यटकांमध्ये कामोठ्यातील एका भाजपच्या माजी नगरसेविकेचाही समावेश होता. गोरखपूर येथून माजी नगरसेविका विमानाने घरी परतल्या, इतर प्रवासी रेल्वेने आले.

उपमुख्यमंत्र्यांना केलेल्या एका मेसेजमुळे सगळी सूत्रे हलली आणि आम्ही कामोठ्यात सुखरूप पोहोचू शकलो. गृहमंत्री अमित शहा, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींच्या कार्यालयाकडून चांगली मदत झाल्यामुळेच आम्ही सर्वजण सुखरूप घरी पोहोचलो. आम्ही सर्वांचे आभारी आहोत – संजय म्हात्रे, रहिवासी, कामोठे

अग्निशमन दलाचे जवान रांगत-रांगत वर पोहोचले, समोर कोळसा झालेले सहा मृतदेह अन् कुत्रा
Read Latest Maharashtra News And
Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed