फेब्रुवारीचा विषय या नोंदीसंबधांत नाही. सुप्रीम कोर्टातील लढा वरचं आरक्षण टिकवण्यासाठी आहे. २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण लागू होणार, असं जरांगे म्हणाले. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना लाभ मिळण्यासाठी सरकार काय करणार, असा सवाल जरांगे यांनी केला.
महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार हे ठामपणे मिळेल. सरकारनं सरसकट हे शब्द घेऊन आरक्षण द्यावं. सरकारनं गोंधळ दूर करावा, असं जरांगे म्हणाले. सरकारनं आम्हाला अंधारात ठेवलं तर आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागेल, असं जरांगे म्हणाले.
राज्यात ५४ लाख लोकांच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना लाभ दिले जातील. फेब्रुवारीपर्यंत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येईल, असं सांगितलं जातं आहे. आम्ही ती मागणी केलेली नाही. ते आरक्षण टिकेल की नाही टिकेल असे अनेक प्रश्न आहेत. ५० टक्क्यांच्यावर जाणारं आरक्षण टिकणार नाही, पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे, असं जरांगे म्हणाले.
आम्हाला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावं ते दिलं नाही तर आम्ही आंदोलन सुरु करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. सरकारनं ते दोन शब्द सांगावेत. त्यांच्या तज्ज्ञानं ते शब्द लिहिलेले आहेत. सरकारचा खरेपणा दिसून आला, असंही जरांगे म्हणाले. सरकार मराठ्यांना ओबीसींना आरक्षण देतील असं वाटतंय. सरकारनं आरक्षण नाही दिलं तर २४ डिसेंबर पासून आंदोलन सुरु करु, असं मनोज जरांगे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News