• Sat. Sep 21st, 2024

राज्यात अपघातांचं सत्र सुरुच; ठाण्यात पुन्हा भीषण अपघात, मद्यधुंद चालकानं तिघांना चिरडलं

राज्यात अपघातांचं सत्र सुरुच; ठाण्यात पुन्हा भीषण अपघात, मद्यधुंद चालकानं तिघांना चिरडलं

ठाणे (उल्हासनगर) : लग्न समारंभावरून उल्हासनगरच्या दिशेने येत असलेल्या एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकाने रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कल्याण – बदलापूर रस्त्यावर असलेल्या शांतीनगर येथे दारूच्या नशेत असलेल्या एका वाहनचालकाने रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सोमुदीप जाना, अंजली जाना, शंभूराम चव्हाण या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

दोन तृतीयांश आमदार पाठीशी, म्हणून पक्ष तुमचा होत नाही, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचा युक्तिवाद
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी लवेश रामानी या वाहनचालकाला ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे वाहन चालवणारा तरुण हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. तसेच त्याच्या गाडीचा पंचनामा केला असता त्यात दारूची बाटली तसेच इतर वस्तू आढळून आल्या आहेत.

Nagpur Explosion: स्फोट की घातपात? ATS अ‍ॅक्शनमोडवर, गेल्या दोन दिवसांतील सर्व हालचाली तपासणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed