आमच्याशी दगा फटका झाला….
आम्ही वारंवार सांगतोय निष्पाप लोकांना गुंतवण्यात आलं आहे. माजलगावमधील बाहेर शिकायला असलेल्या पोरांना घेण्यासाठी घरी गेले आहेत. सरकार आम्हाला एकीकडून हा म्हणतंय आणि पोरांना उचलतंय, असं मनोज जरांगे म्हणाले. आमच्याशी दगा फटका झाला आहे. सगळ्यांनाच अटक होणार हे धरुन चाललो आहे. तुमच्यासमोर बोलायचं नाही तर कुणासमोर बोलायचं, गुन्हे मागं घेऊ म्हणले आणि माणसांना अटक केली आहे. तीन जणांना अटक करण्यात आली आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सरकारनं दिलेला शब्द पूर्ण झाला नाही. आमच्या समाजाला डाग लागलेला आहे. काल आणि आज सकाळी आमच्या लोकांना नोटीसा दिल्या गेल्या आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले.
अंतरवाली मध्ये ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली ते १३२ हून अधिक पोलीस होते. त्यांची चौकशी करण्यात यावी, असं मनोज जरांगे म्हणाले. तीन महिने झाले आमची काय चूक झाली. एक एक माणसं उचलली जात आहेत, कशी तुमच्याशी चर्चा करायची, असं मनोज जरांगे म्हणाले.
गिरीश महाजन काय म्हणाले?
सरकार मराठा आरक्षणाच्या बाबत वेगानं पुढं गेलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका सरकारची असल्याचं महाजन म्हणाले. रात्र दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि गावांमध्ये नोंदी तपासण्याचं काम सुरु आहे. सरकारला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. गेल्यावेळी च्या त्रुटी निघाल्या त्या यावेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News