Ashish Shelar On Rahul Gandhi: ‘जंतरमंतरवरील आंदोलनाकडे तोंड करायचे आणि रांचीमधील आंदोलनाकडे पाठ करायची ही विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.
‘रांची येथे विद्यार्थी शांततापूर्ण, संयमीपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत असताना आणि त्यांनी कोणतीही असभ्य भाषा किंवा अपमानास्पद भाषा वापरली नसताना विद्यार्थ्यांच्या मार्गात काटेरी तार टाकण्यात आली. त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्यात आला. लाठीमार करण्यात आला. शत्रू समजून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून त्याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच असेल. हे सरकार केवळ झारखंड मुक्ती मोर्चाचे नाही. १६ आमदार आणि चार मंत्री घेऊन राहुल गांधी त्या सरकारचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन आता कोणती भूमिका मांडणार आहेत’, असे प्रश्न शेलार यांनी केले.
Harshwardhan Sapkal | राहुल गांधी पळून जाणारे नव्हेतर भिडणारे नेते, सपकाळांचा भाजपला टोला
‘राज आणि उद्धव गप्प का?’
‘राहुल गांधींची विद्यार्थ्यांप्रतिची सहानुभूती आता कुठे आहे ? दिल्लीत खोटी सहानुभूती दाखवणारे राहुल गांधी, झारखंडमधील विद्यार्थ्यांचे अश्रू पुसायला का जात नाहीत? आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे का मूग गिळून गप्प आहेत? आता मीडियासाठी मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे का बंद आहे’, असे प्रश्नही शेलार यांनी केले.
Devendra Fadnavis: बावनकुळेंची पाठराखण, जरांगेंवर पलटवार; टीकेनंतर फडणवीसांनी आरक्षण प्रश्नावर मांडली रोखठोक भूमिका‘नरेंद्र मोदी व अमित शहा हेच पळपुटे’- हर्षवर्धन सपकाळ
राहुल गांधी हे पळणारे नेते नाहीत तर लढणारे नेते आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला त्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत , परंतु चर्चेत भाग घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घाबरत आहेत . १२ वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान व चर्चेपासून पळ काढणारे अमित शहा हेच खरे पळपुटे आहेत’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी मुंबईत दिली.
महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेण्यात आला तसेच राज्यातील राजकीय , सामाजिक व इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर तसेच रणनितीवरही चर्चा करण्यात आली.
