• Wed. Aug 12th, 2026

    Ashish Shelar On Rahul Gandhi: ‘जंतरमंतरवरील आंदोलनाकडे तोंड करायचे आणि रांचीमधील आंदोलनाकडे पाठ करायची ही विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : ‘झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीविरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रांची येथे झालेल्या अमानुष हल्ल्याचे आदेश कुणी दिले होते, असा प्रश्न आता राहुल गांधी विचारणार आहेत का आणि कुणाचा राजीनामा मागणार की स्वत: देणार’, असा प्रश्न सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

    ‘रांची येथे विद्यार्थी शांततापूर्ण, संयमीपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत असताना आणि त्यांनी कोणतीही असभ्य भाषा किंवा अपमानास्पद भाषा वापरली नसताना विद्यार्थ्यांच्या मार्गात काटेरी तार टाकण्यात आली. त्यांच्यावर अश्रुधूर सोडण्यात आला. लाठीमार करण्यात आला. शत्रू समजून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून त्याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच असेल. हे सरकार केवळ झारखंड मुक्ती मोर्चाचे नाही. १६ आमदार आणि चार मंत्री घेऊन राहुल गांधी त्या सरकारचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन आता कोणती भूमिका मांडणार आहेत’, असे प्रश्न शेलार यांनी केले.

    Harshwardhan Sapkal | राहुल गांधी पळून जाणारे नव्हेतर भिडणारे नेते, सपकाळांचा भाजपला टोला

    ‘राज आणि उद्धव गप्प का?’

    ‘राहुल गांधींची विद्यार्थ्यांप्रतिची सहानुभूती आता कुठे आहे ? दिल्लीत खोटी सहानुभूती दाखवणारे राहुल गांधी, झारखंडमधील विद्यार्थ्यांचे अश्रू पुसायला का जात नाहीत? आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे का मूग गिळून गप्प आहेत? आता मीडियासाठी मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे का बंद आहे’, असे प्रश्नही शेलार यांनी केले.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: बावनकुळेंची पाठराखण, जरांगेंवर पलटवार; टीकेनंतर फडणवीसांनी आरक्षण प्रश्नावर मांडली रोखठोक भूमिकानरेंद्र मोदी व अमित शहा हेच पळपुटे’- हर्षवर्धन सपकाळ

    राहुल गांधी हे पळणारे नेते नाहीत तर लढणारे नेते आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला त्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत , परंतु चर्चेत भाग घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घाबरत आहेत . १२ वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान व चर्चेपासून पळ काढणारे अमित शहा हेच खरे पळपुटे आहेत’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी मुंबईत दिली.

    महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेण्यात आला तसेच राज्यातील राजकीय , सामाजिक व इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर तसेच रणनितीवरही चर्चा करण्यात आली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा