• Sun. Sep 20th, 2026

२१ वर्षांनी कपाळावर कुंकू, हाती हिरवा चुडा; मुलीच्या लग्नात सासरच्या मंडळींनी दिलं वीरपत्नीला ‘सौभाग्याचं लेणं’

२१ वर्षांनी कपाळावर कुंकू, हाती हिरवा चुडा; मुलीच्या लग्नात सासरच्या मंडळींनी दिलं वीरपत्नीला ‘सौभाग्याचं लेणं’

विधवा महिलांना ताठ मानेने जगता यावे यासाठी उपक्रम

आजघडीला शिक्षणामुळे समाजात मोठा सामाजिक बदल घडून येत आहे. महाराष्ट्रात गावागावात महिलांवर अन्याय करणारी विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेतले जात आहेत. याचबरोबर काही सामाजिक संस्थाही या कार्यात अग्रेसर राहिल्या आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे गावातील विधवा महिलेस समाजात ताठ मानेने वावरता येणार आहे. नुकतीच अशीच एक घटना सातारा जिल्ह्यामध्ये घडली.

मुलीच्या लग्नात वीरपत्नीला सौभाग्याचं लेणं

मुलीच्या लग्नात वीरपत्नीला सौभाग्याचं लेणं

सैन्यदलात कार्यरत असलेल्या पतीचं २१ वर्षांपूर्वी निधन झालं. तेव्हापासून त्यांना ना कधी हळदी कुंकवाचा मान मिळाला, ना कोणत्या धार्मिक कार्यात मानाचं स्थान मिळालं. मात्र, मुलीच्या लग्नात सासरच्या मंडळींनी त्यांना धार्मिक कार्याचा मान तर दिलाच शिवाय ‘सौभाग्याचं लेणं’ ही पुन्हा बहाल केलं. त्यामुळे या महिलेच्या आयुष्यात पुन्हा आनंद आला आहे. सासरच्या लोकांच्या या निर्णयाने एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

२१ वर्षांपूर्वी पतीला हौतात्म्य, एकटीने मुलीचा सांभाळ केला

२१ वर्षांपूर्वी पतीला हौतात्म्य, एकटीने मुलीचा सांभाळ केला

कोरेगाव तालुक्यातील रुई गावचे सुपुत्र सुनील सावंत सैन्यदलात कार्यरत होते. २१ वर्षांपूर्वी त्यांना हौतात्म्य आले. पतीच्या निधनानंतर नीता सुनील सावंत यांनी सासर सोडलं आणि कोंडवे (तालुका सातारा) हे आपलं माहेर गाठलं. येथे राहूनच त्यांनी एकुलती एक मुलगी शिवानीचं संगोपन केलं, तिचं शिक्षण पूर्ण केलं. मुलगी शिवानी हिने कोंडवेतील ननावरे कुटुंबात सून म्हणून गृहप्रवेश केला.

लग्नाच्या विधी मुलीच्या आईनेच कराव्या, सासू-सासऱ्यांची इच्छा

लग्नाच्या विधी मुलीच्या आईनेच कराव्या, सासू-सासऱ्यांची इच्छा

मात्र, लग्नाच्या पूर्वी सर्व विधी शिवानीच्या आईनेच कराव्यात, अशी इच्छा सासू संगीता आणि सासरे अवधूत ननावरे यांनी व्यक्त केली होती. या उप्रकमाला नीता सावंत यांच्या जाऊबाई सुनीता सावंत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. लग्नाचा पहिला विधी म्हणजे मुहूर्तमेढ आणि घाणा भरणे. हा विधी नीता सावंत यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमातच त्यांना हळदी कुंकुवाचा मान देण्यात आला. इतकंच नाही तर त्यांच्या हातात हिरवा चुडाही भरण्यात आला.

जय हिंद फाउंडेशन राबवत असलेल्या उप्रकमाचे नागरिकांकडून कौतुक कौतुक

जय हिंद फाउंडेशन राबवत असलेल्या उप्रकमाचे नागरिकांकडून कौतुक कौतुक

विधवा प्रथा ही बुरसटलेल्या समाजव्यवस्थेचा भाग आहे. ही बेडी तोडून वीरपत्नी आणि वीरमातांना सौभाग्याचं लेणं मिळवून देण्यासाठी जय हिंद फाउंडेशन राबवत असलेल्या या उप्रकमाचे नागरिकांनी खूप कौतुक केले आहे. यावेळी सैनिक फेडरेशन, जयहिंद फाउंडेशनच्या जिल्हा महिलाप्रमुख उर्मिला कदम, जावळी तालुका कार्याध्यक्षा सुवर्णा जाधव, उर्मिला पवार, विद्या बर्गे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed