• Sat. Sep 21st, 2024
आनंद निरगुडेंनी राजीनामा दिल्याची बाब सरकारने आठ दिवस लपवली; काहीतरी लपवाछपवी सुरुये: राऊत

मुंबई: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. हे दोन मंत्री मागासवर्ग आयोगावर आपल्याला हवा तसा अहवाल तयार करण्यासाठी दबाव आणत होते, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले. माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राज्य मागसवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बाब सरकारने आठ दिवस दडवून ठेवली. या सगळ्यात काय लपवाछपवी सुरु आहे, हे पाहिलं पाहिजे. आयोगावर कुठल्या प्रकारचा अहवाल द्यावा, यासाठी दबाव असल्याची बाब मात्र यानिमित्ताने स्पष्ट झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

आनंद निरगुडे यांच्यासह मागासवर्ग आयोगाच्या काही सदस्यांनी यापूर्वीच आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार हा संपूर्ण आयोग बरखास्त करुन नव्या आयोगाची स्थापना करणार का, हे पाहावे लागेल. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार असे का वागत आहे, हे जनतेला कळत नाही. आता कधीतरी विधिमंडळात खास अधिवेशन बोलावून त्यामध्ये मराठा समाजासाठी काहीतरी ठराव करतील. लगेच लोकसभेच्या निवडणुका लागतील, त्या निवडणुका काढून घेण्याचं काम केले जाईल. मराठा आरक्षणाबाबत जो कालापव्यय चालू आहे, तो लोकसभा निवडणुकीचं टायमिंग साधण्यासाठी आहे का, अशी शंका आता लोकांना वाटू लागल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडेंचा राजीनामा; सरकारमधील दोन मंत्र्यांवर कामकाजात हस्तक्षेपाचा आरोप

विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती श्री.आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहे. अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना याबाबत सरकारने कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही? सरकारचं नेमकं अस चाललं काय ? राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य आणि आता अध्यक्ष का राजीनामा देत आहे याबाबत सरकारने सभागृहात स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मागासवर्ग आयोगात आला आणि दबाव टाकणं सुरू झालं, लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सभांचा सपाटा लावलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. लातूर जिल्ह्यातील माकनी आणि मुरुड येथे सभा घेतल्यानंतर ते बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथे सभा घेण्यासाठी आले होते. सभेदरम्यानच त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांनी मंचावर खाली बसून भाषण केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मराठवाड्यातील गावात मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी, काय सांगते सर्वेक्षण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed