• Sat. Sep 21st, 2024
जन्मदिन विशेष : शरद पवार जेव्हा कर्नाटकात घुसले होते, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या; पण…

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या वर्षी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुप्रिया सुळेंनी ८०च्या दशकात झालेल्या एका आंदोलनाची आठवण सांगितली होती. कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद उफाळला असताना शरद पवार कर्नाटकात घुसले, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या असा किस्सा सुळेंनी सांगितला होता. शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊया ही आठवण.

वाचा- दुसऱ्या वनडे आधी टीम इंडियाला बसला मोठा झटका; संघात करावा लागेल बदल, पाहा कोणाला

सुप्रिया सुळेंची फेसबुक पोस्ट…

शरद पवार साहेबांनी कर्नाटक पोलीसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता. सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला.

वाचा- सत्तेत असताना शांत बसणाऱ्यांना आता कंठ कसा फुटला?; सीमाप्रश्नावरून भाजपचा ठाकरेंना सवाल

खुद्द एस एम जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरविलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.


पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होते.बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही. साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता.

वाचा- ठाकरे गटाचे खासदार आक्रमक, सीमावादाचा मुद्दा तापणार, संसदेत वादाचे पडसाद उमटणार

बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला.आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.

साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed