• Sat. Sep 21st, 2024
लेकीच्या लग्नानंतर ८ कोटींचे दागिने रिक्षात विसरले, बाबांना ब्रह्मांड आठवलं, पुढच्या तासाभरात…

मुंबई : आठ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू असलेली बॅग वृद्ध प्रवासी रिक्षात विसरला. रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने जेव्हा त्याला याची आठवण झाली, तेव्हा त्याला अक्षरशः ब्रह्मांड आठवलं. परंतु पोलिसांच्या कृपेने त्याला त्याचा ऐवज जसाच्या तसा परत मिळाला. तोही अवघ्या काही तासांच्या आत.

बोरिवलीतील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी अर्थात MHB कॉलनी पोलिसांनी तासाभरात आठ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू असलेली बॅग शोधून काढली. रिक्षात आपली बॅग विसरुन गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांना माहिती दिली. त्यानंतर ते रिक्षाचा माग काढण्यात आणि मौल्यवान वस्तू परत मिळवण्यात यशस्वी झाले.

१६ महिन्यांत पाच वेळा हार्ट अटॅक, मुंबईतील ५१ वर्षीय महिलेचा मृत्यूला चकवा, डॉक्टरही संभ्रमात
सत्तर वर्षीय भारत आरते हे त्यांच्या मुलीच्या लग्न समारंभानंतर रिक्षामधून परत येत होते. त्यांच्या बॅगेत सोन्या-चांदीचे दागिने होते. मात्र रिक्षातून उतरताना ते नेमके ती बॅग काढायलाच विसरले. बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कार्यवाही केली.

Pune News : WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, पुण्यातील कर्मचाऱ्याची बॉसला मारहाण, iPhone ही फोडला
अन्य एका घटनेत, मालाड पूर्व येथे कुरार पोलिसांनी एका रिक्षा चालकाला सहा लाख रुपयांचे दागिने चोरल्याबद्दल अटक केली. एक महिला प्रवासी चुकून दागिन्यांची पिशवी त्याच्या रिक्षात विसरली होती. “रिक्षा चालक शिवप्रसाद यादव याच्याकडे दागिने जवळच्या पोलीस ठाण्यात आणण्यासाठी पुरेसा वेळ होता. पण त्याने मुद्दाम बॅग सोबत ठेवली,” असे पोलिसांनी सांगितले

चोराने नवं अलिशान घर बांधलं, पण टीव्ही नसल्याने थेट चोरी; पोलिसांकडून अटक होताच स्वप्न अपूर्ण!

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed