पुणे : लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही महिन्यातच वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद वाढवण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेसाठी सर्वच पक्षांचे नेते आग्रही असल्याचे पहायला मिळत आहे. सलग तीन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे यावर वर्चस्व राहिले आहे. मात्र येत्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी यावर दावा ठोकला आहे. त्यात अजित पवार यांनी वेगळा गट निर्माण केल्याने त्यांनीही या मतदारसंघात मुलाच्या राजकीय लाँचिंगसाठी फील्डिंग लावण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यातच सुनील शेळके यांनीही या मतदारसंघावर दावा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणे हे गेल्या तीन टर्मपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. आगामी निवडणुकीत देखील उमेदवारी आपल्यालाच मिळणार, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. त्यातच भाजपकडून देखील बाळा भेगडे मावळ लोकसभेसाठी इच्छुक असून वरिष्ठांच्या आदेशावर गोष्टी ठरणार आहेत. तसेच अजित पवार गटाने देखील या जागेवर दावा ठोकल्याने पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून वातावरण निर्मिती केली जात असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणे हे गेल्या तीन टर्मपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. आगामी निवडणुकीत देखील उमेदवारी आपल्यालाच मिळणार, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. त्यातच भाजपकडून देखील बाळा भेगडे मावळ लोकसभेसाठी इच्छुक असून वरिष्ठांच्या आदेशावर गोष्टी ठरणार आहेत. तसेच अजित पवार गटाने देखील या जागेवर दावा ठोकल्याने पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून वातावरण निर्मिती केली जात असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
या जागेबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. याशिवाय मनसेने देखील या जागेसाठी चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि मनसे या पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर या जागेसाठी फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र अजित पवार मुलाच्या लाँचिंगसाठी मावळमध्ये राजकीय गणिते बदलून घेणार का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Latest Pune Updates And Marathi News