• Sat. Sep 21st, 2024
अवकाळीग्रस्त तातडीने पंचनामे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, राज्य मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय

मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हवालदिल झालेला बळीराजा मदतीच्या प्रतिक्षेत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच पंचनामे झाल्याबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. दुसरीकडे झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याने झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठक

बुधवार २९ नोव्हेंबर २०२३

१) अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार (मदत व पुनर्वसन)

२) झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा (गृहनिर्माण विभाग )

३) राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा (शालेय शिक्षण)

४) मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार (मराठी भाषा विभाग)

५) मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली (अल्पसंख्याक विभाग )

६) औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन (उद्योग विभाग )

७) महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार (महसूल विभाग)

८) शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा (महसूल विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed