• Thu. Mar 19th, 2026

    अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं , लिंबांसह आंब्यांच्या मोहोराचा सडा, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

    अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं , लिंबांसह आंब्यांच्या मोहोराचा सडा, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

    नांदेड : चार एकरामध्ये लिंबू आणि आंब्याची रोपे लावली. तळहाताच्या फोडा सारख जपलं. लिंब विक्रीसाठी तर आंब्याला मोहोर येऊन कै-या लागल्या होत्या. शेतकऱ्याला खूप काही आशा होती, मात्र पहाटे रानात येऊन पहातो तर काय…अवकाळी पावसानं रानभर लिंब अन् आंब्याचा मोहर, कै-यांचा खच पडला. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं होतं. पोराबाळांचं शिक्षण, लोकांकडून हात उसने घेतलेलं कर्ज कसं फेडणार? अवकाळीनं स्वप्न भंगल.. आता तरी मायबाप सरकार मदत करेल का? अशी साद शेतकरी मानेजी गंगाधर कोकाटे यांनी घातली आहे.

    नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका केळी उत्पादनात अग्रेसर आहे. अर्धापूरी जातीच्या केळीला परदेशात मागणी आहे. पारंपरिक शेती बरोबरच तालुक्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करतात. चेनापूर येथील शेतकरी मानेजी कोकाटे यांना चार एकर शेती आहे. रब्बी पीक घेण्या ऐवजी त्यांनी चार एकर मध्ये फळबाग फुलवण्याचा निर्णय घेतला. पुण्याहून कादगी प्रकाराचे दोन हजार लिंबाचे रोपे आणली. २० बाय २० फुट खड्डा करून रोपांची लागवड केली. तसेच केसर, हापूस, कलम, इलम या प्रकाराचे झाडे देखील लावली. योग्य नियोजन केले होतं. वेळेवर पाणी, खत दिल्यामुळं झाडांची जोमात वा झाली होती. फळ धारणाही चांगली झाली होती. लिंब तोडणीसाठी आले होते. वर्षापोटी जवळपास पाच लाख रुपये उत्पन्न मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र सोमवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळ मोठं नुकसान झाल्याच कोकाटे यांनी सांगितल.
    सामाजिक कार्यकर्त्याचा मृतदेह आढळला, पत्नीचा एक संशय अन् भयंकर गुन्ह्याचा उलगडा

    अवकाळी पावसामुळे पपईची बाग आडवी, लाखोंचे नुकसान

    दुसरीकडे अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील शेतकरी लालबा जाधव या शेतकऱ्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. लालबा जाधव यांनी पपईची बाग फुलवली होती. पपईची एक हजार झाडे लागवड होती. या बागेसाठी मोठा खर्चही केला. मोठ्या कष्टाने बाग खूप चांगली होती. भाव यंदा दरवर्षीच्या तुलनेत चांगला असल्यामुळे चांगले उत्पन्न अपेक्षित होते. दहा ते बारा टन माल काढणीस आला होता. त्यामुळे अंदाजे अडीच लाख रुपयांचा माल शेतात तयार होता. पण अचानकपणे सोमवारी पहाटे वादळी वारा अन पाऊस आला आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. एक हजार पैकी ४०० झाडे आडवी पडली. पाच लाख रुपयांचा फटका शेतकऱ्याला बसला.
    कार्तिकी एकादशीला अनर्थ, फुलं तोडताना विद्युत तारेचा स्पर्श, सुट्टीवर आलेल्या विद्यार्थ्याचा अंत

    जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी

    नांदेड शहरासह जिल्ह्यात सोमवारी (दि.२७) पहाटे अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर जिल्ह्यातील बारा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नांदेड शहर – ६८ मी. मी., लिंबगाव- ९९, तरोडा-८२.३०, नाळेश्वर-७०. ८०, अर्धापूर-७७.५० मी. मी, दाभड-६९ मी मी, उस्माननगर-७६.३०, सोनखेड-७६. ३०, कलंबर-७६.३०, शेवडी-७४. ७४, तामसा-६५.३०, पिंपरखेड-६५.३० अशी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ५५ मि. मी. पाऊस झाला आहे. नांदेड, अर्धापूर, हदगाव, भोकर, मुदखेड, लोहा, हिमायतनगर, नायगाव, कंधार, माहूर, किनवट या तालुक्याला पावसाने झोडपून काढले होते.

    व्यापारी दुकानात आला; शटर उघडण्यासाठी बॅग खाली ठेवली, तेवढ्यातच अनर्थ, घटना सीसीटीव्हीत कैद
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *