• Wed. Mar 11th, 2026

    जरांगे-भुजबळांच्या नुरा कुस्तीने भाजपचा फायदा,अंधारेंनी आरक्षणाच्या लढाईमागील राजकारण उलगडलं

    जरांगे-भुजबळांच्या नुरा कुस्तीने भाजपचा फायदा,अंधारेंनी आरक्षणाच्या लढाईमागील राजकारण उलगडलं

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रं देऊन त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी छगन भुजबळ यांना एक जाहीर पत्र लिहले आहे. या पत्रातून सुषमा अंधारे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांच्या पटलेल्या आणि न पटलेल्या भूमिका सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. मुळात मराठा समाजाला आरक्षण देणे ही केंद्रातील भाजप सरकारची जबाबदारी आहे. अंतरवाली सराटी येथील पोलीस लाठीमाराच्या घटनेला गृहमंत्र्यांचे अपयश कारणीभूत आहे. पण सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सुरु असलेल्या नुरा कुस्तीचा फायदा हा भाजपला होणार आहे, असे सुषमा अंधारे यांनी पत्रात म्हटले आहे.

    सर परवा झालेल्या सभेमध्ये तुमचं झालेलं भाषण मी किमान दोन-तीन वेळा ऐकलं. प्रत्येक मुद्दा फार काळजीपूर्वक ऐकला. काही मुद्दे मला पटले सुद्धा. बीड मधील जाळपोळ हिंसाचार हा पूर्वनियोजितच होता. त्या हिंसाचाराचे समर्थ न कोणीही करू शकत नाही. पण बीड ची जाळपोळ घडवणारे ते मराठा आंदोलकच होते हे कशावरून? जाणीवपूर्वक मराठा आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी दुसऱ्याच कुणीतरी हात धुवून घेतला नसेल कशावरून जसे भीमा कोरेगाव प्रकरणात झाले. मनोज जरांगे यांच्या पहिल्या उपोषणानंतर झालेला लाठीमार, गोळीबार किंवा दुसऱ्यांदा बिड मध्ये झालेली जाळपोळ याला जरांगे जबाबदार आहेत असे सांगताना फडणविस गृहमंत्री म्हणुन पुरते अपयशी ठरले हे का सांगितले नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी छगन भुजबळांना पत्रातून विचारला.

    OBC Reservation: आरक्षणाला धक्का लागला तर सरकारला खाली खेचण्याची ओबीसींमध्ये ताकद: प्रकाश शेंडगे

    तसेच मनोज जरांगे पाचवी पास आहे असे आपण म्हणालात. कदाचित ते खरे ही असेल पण ते पाचवी पास आहेत आणि म्हणून त्यांना या आरक्षण प्रश्नातल्या खाचा खोचा समजत नसतील तर तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेले आहात. तुम्ही समजावून सांगाव्यात, असेही अंधारे यांनी म्हटले आहे.

    मराठा आरक्षण ही केंद्र सरकारची जबाबदारी: सुषमा अंधारे

    कालच्या सभेत तुम्ही आरक्षणाचा प्रश्न हा राज्याशी संबंधित नाही तर तो केंद्र सरकारशी संबंधित आहे. कारण मूलभूत हक्काशी संबंधित कलमांमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार कलम 368 (क) नुसार फक्त आणि फक्त केंद्र सरकारला आहे हे सांगणे गरजेचे होते. तमिळनाडू मध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण का आहे? कसे आहे ? ते कोणत्या परिस्थितीत झाले आणि तो कायदा नंतर नवव्या परिशिष्टामध्ये कसा समाविष्ट करण्यात आला ? हे आपण जरांगे यांच्या पेक्षा जास्त शिकलेले आहात या नात्याने तमाम ओबीसी आणि मराठा बांधव दोघांनाही समजावून सांगणे अपेक्षित होते. पण आपण ओबीसींच्या बाजूने ओबीसींचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी नाही तर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करून चिथावणी देत आहात असे वाटले, असे मत सुषमा अंधारे यांनी पत्रात मांडले आहे.

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच बोलणं बंद करावं अन्यथा….; मनोज जरांगेंचा इशारा

    राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर सुषमा अंधारेंची टीका

    एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणायचं की, शिवछत्रपतींची शपथ मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे तर दुसरीकडे फडणवीस यांनी सांगायचे की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. एकीकडे मराठा आरक्षणाच्या विरोधात फडणवीसांना श्रद्धेय म्हणणारे गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल करायची तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या विरोधात संघाचा समर्थक असणाऱ्या सराटे नावाच्या माणसाने याचिका दाखल करायची. एकीकडे भाजपमधीलच काही लोकांनी धनगर आरक्षणाची मागणी करायची आणि आम्हाला एसटीतून आरक्षण हवे आहे म्हणायचे तर दुसरीकडे आमदार नरहरी झिरवाळ यांनी त्या आरक्षणाला विरोध करत असे झाले तर आमचे २५ आमदार राजीनामा देतील अशी धमकी द्यायची. एकीकडे आम्ही मराठा आरक्षणाच्या सोबतच आहोत असे उपोषण स्थळी जाऊन संदिपान भुमरे, अतुल सावे किंवा गिरीश महाजन यांनी सांगायचे तर दुसरीकडे जरांगेचा बोलविता धनी कोण असा प्रश्न विचारत तूम्ही स्वतः, नितेश राणे आणि दरेकर यांनी विरोध करायचा. आता मला सांगा सर, देवेंद्र फडणवीस, गुणरत्न सदावर्ते , नरहरी झिरवाळ, नितेश राणे गिरीश महाजन स्वतः तुम्ही एकनाथ शिंदे, असे सगळे लोक आरक्षणाचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे हे सगळे एकाच सरकारमध्ये आहात. मग आरक्षणाच्या नावावर ही नुरा कुस्ती कशासाठी चालू आहे?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी छगन भुजबळ यांना विचारला.

    मी डगमगणार नाही; फडणवीस साहेब इशारा देताय का? सुषमा अंधारे पत्रकार परिषदेत रडल्या

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *