• Sun. Jun 14th, 2026

    आंदोलन करुन थकलो.. मराठा आरक्षणासाठी धाराशिवच्या शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

    आंदोलन करुन थकलो.. मराठा आरक्षणासाठी धाराशिवच्या शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

    धाराशिव : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा तापलं आहे. सप्टेंबर २०२३ पासून मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर पकडला आहे. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभर दौरे केले जात आहेत. उपोषण, गावबंदी, धरणे आंदोलन, साखळी उपोषण अशा प्रकारे आंदोलन सुरु असताना काही मराठा तरुणांनी, व्यक्तींनी टोकाचं पाऊल उचललं आहे. आजच्या दिवसात मराठावाड्यात नांदेड मध्ये एका मुलीनं टोकाचं पाऊल उचललं तर धाराशिव जिल्ह्यात देखील एका शेतकऱ्यानं मराठा आरक्षण मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं एका चिठ्ठीत लिहून ठेवत जीवन संपवलं.

    मराठा आरक्षणसाठी धाराशिव जिल्हयात एका शेतकऱ्यानं जीवन संपवलं

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धाराशिव जिल्हयातील सरमकुंडी येथील विनोद त्र्यंबक गायकवाड ४० वर्षे या शेतकऱ्यानं जीवन संपवलं. ते शेती आणि ट्रॅक्टर टेम्पो ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी रात्री शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. विनोद त्र्यंबक गायकवाड यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय वाशी येथे आणण्यात आला आहे. आहे.विनोद त्र्यंबक गायकवाड यांच्या पश्च्यात पाच वर्षाची मुलगी पत्नी आणि एक भाऊ आणि आई आहे.
    Chhagan Bhujbal : अंतरवाली सराटीत पोलिसांच्या लाठीचार्ज अगोदर काय घडलेलं?छगन भुजबळ घटनाक्रम सांगत म्हणाले…
    मी माझ्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही.म्हणून मी आता आंदोलन करुन थकलो आहे.त्यामुळे मी मरुन जात आहे.त्यामुळे मी फाशी घेतली असे विनोद त्र्यंबक गायकवाड मृत्यूअगोदर लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
    अंबडमध्ये आज ओबीसींचा एल्गार; देशभरातून समाजबांधवांची उपस्थिती राहणार, काय आहेत मागण्या?

    मराठा मागास आहे का हे तपासण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या राज्य मागासवर्ग आयोगाला सूचना

    मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. मराठा समाज मागास आहे का तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाला दिलेल्या आहेत. आजचं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयानं गायकवाड आयोगाच्या अहवालात ज्या त्रुटी दाखवल्या त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्यानं सर्वेक्षण करण्यासाठी तीन संस्था नेमल्या जातील, अशी देखील माहिती आहे.
    आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, ते काय आहे ते तर समजून घे, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल

    बॅनर्स फाडल्यामुळे मनोज जरांगे संतापले, मराठा समाजाला मी नुसतं हू म्हटलं तरी तुमची जिरवतील

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed