• Sat. Sep 21st, 2024

सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड कमी करून वेगाने कुणबी नोंदी तपासव्यात : मनोज जरांगे

सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड कमी करून वेगाने कुणबी नोंदी तपासव्यात : मनोज जरांगे

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात कुणबी नोंदी तपासणीच्या कामासाठी मनुष्यबळ वाढवून अधिक गतीने काम करण्याची गरज आहे. काही जिल्ह्यात अद्याप नोंदी शोधण्याचे काम सुरू झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून नोंदी तपासणी वाढवावी, असे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले. मराठवाड्यात तपासणीच्या कामात अभ्यासक कमी असल्यामुळे तुलनेने कमी नोंदी आढळल्या आहेत, असेही जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या कार्यवाहीबाबत राज्य शासनाने अद्याप लेखी मसुदा सादर केलेला नाही. राज्य शासनाने ही कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी शुक्रवारी केली. आतापर्यंत लेखी मसुदा देणे अपेक्षित होते. पण, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर दोन दिवस अधिक वाट पाहिली, असे जरांगे म्हणाले.

मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीत होता, त्यांना जे फायदे मिळतायत ते सगळे आम्हालाही हवेतच: मनोज जरांगे पाटील
शासनाने कुणबी नोंदी शोधण्याचे काम गतीने करावे. कुणाच्या तरी दबावाने एवढे दिवस लपून ठेवलेले मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण मिळणार आहे. आधी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाटेल तेवढी वाढवा. इतर आरक्षणाच्या मर्यादा वाढविण्यावर आमचे काही मत नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मिळवत आहोत, असे जरांगे म्हणाले. काही जिल्ह्यात ५० हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आता सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड कमी करावे. कारण हे नेते मराठा समाजाच्या विरोधात बोलून वातावरण दूषित करीत आहेत. मराठा समाजाच्या भावना सरकारने लक्षात घ्यावी, असा इशारा जरांगे यांनी दिला. मराठवाड्यात पावसाअभावी पिके गेली आहेत. पाणी नसल्यामुळे अडचणी वाढल्या असून सरकारने दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली.

कुणबी नोंदीची व्यापक छाननी होणार, मराठा आरक्षणाच्या बैठकीत काय ठरलं?
बच्चू कडू, अमित देशमुख भेटीला

आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी रात्री उशिरा मनोज जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली. अहमदनगरहून येताना त्यांनी जरांगे यांची भेट घेत कालनिश्चितीबाबत चर्चा केली. आमदार अमित देशमुख यांनी शुक्रवारी जरांगे यांची रुग्णालयात भेट घेत विचारपूस केली. जरांगे यांच्या लढ्याला आपला पाठिंबा आहे. राज्य आणि केंद्र शासनाने वेळ वाय न घालवता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. सामाजिक सलोखा कायम राहणे आवश्यक असून नेत्यांनी सामाजिक तेढ वाढविणारी वक्तव्ये करू नयेत, असे देशमुख म्हणाले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ काळे, माजी गटनेते भाऊसाहेब जगताप आदी उपस्थित होते.

कोल्हापुरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर, पहिल्याच दिवशी ५०० हून अधिक नोंदी सापडल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed