• Sun. Mar 8th, 2026

    उसाला एका टनाला पाच हजार रुपये दर द्यावा, महादेव जानकर यांची मागणी

    उसाला एका टनाला पाच हजार रुपये दर द्यावा, महादेव जानकर यांची मागणी

    सातारा : मुख्यमंत्र्यांनी या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. सध्या शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार उसाला पाच हजार दर द्यावा, दुधाला एका लीटरला शंभर रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांना टोल माफी करावी, अशी मागणी माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

    राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे आज कराडमध्ये ऊसदर, दूध दराबाबत बळीराजा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर कराड ते पाटण संयुक्त ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांना वंदन करून आम्ही मोर्चा सुरू केला आहे. कराड ते पाटण संयुक्त ट्रॅक्टर रॅली काढली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसांना राजकारणाची दारे खुली केली. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे काम केले. तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरविण्याचे काम सातारा जिल्हा करत आहे. तसेच शेतकऱ्यांला वीज, रस्ता देण्याचे काम त्यांनी केले, असं जानकर म्हणाले.
    ससूनच्या कॅन्टीनमध्ये ड्रग्जची विक्री, रुग्णालयातील प्रत्येकाला ललित पाटील पोहोचवायचा हप्ता: रवींद्र धंगेकर
    एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये असून, जगाच्या पोशिंद्याला आज राजकारण्यांपुढे भीक मागावी लागत आहे.
    धनगर आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी ही सरकारकडून अपेक्षा असल्याचं जानकर यांनी सांगितले.शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी प्रीतिसंगमावरून व्यक्त केली.
    भारत-नेदरलँड्सच्या सामन्यासाठी मॅचविनर खेळाडूची झाली एंट्री, संघात झाला मोठा बदल
    दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. काही साखर कारखान्यांनी दर जाहीर केला असला तरी बहुतांश साखर कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरु केला आहे. उसाच्या दरासाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांना उसाला समाधानकारक दर मिळाला आहे.
    नितीशकुमार सरकारकडून आरक्षणवाढीचं विधेयक विधानसभेत सादर, कुणाला किती आरक्षण मिळणार, जाणून घ्या ?

    कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून घोषणा, ३५ लाख शेतकऱ्यांची दिवाळी गोड

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed