• Sun. Mar 15th, 2026

    मराठा आरक्षणावरुन पत्रकारांचे प्रश्न, पंचांगाचा उल्लेख करत तानाजी सावंत का संतापले?

    मराठा आरक्षणावरुन पत्रकारांचे प्रश्न, पंचांगाचा उल्लेख करत तानाजी सावंत का संतापले?

    पुणे : मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच ऐरणीवर आला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीचे निर्णय देखील घेण्यात आले. काही नेत्यांची घर जळाली तर काही नेत्यांची कार्यालय फोडली गेली. सध्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भैरवनाथ उद्योग समुहातर्फे आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या तरुणांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मात्र, तानाजी सावंत यांनी यावेळी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर का आला ? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यानी दिलेले मराठा आरक्षण तत्कालीन सरकार सुप्रीम कोर्टात का टिकवू शकलं नाही ? असे प्रश्न उपस्थित केले.

    मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान आत्महत्या केलेल्या तरुणांना मदतीचा हात म्हणून भैरवनाथ उद्योग समुहाच्या वतीने ४५ कुटूंबांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करण्यात येणार, असल्याची माहिती दिली. मराठा बांधवांनी आत्महत्या करू नये अशी विनंती तानाजी सावंत यांनी केली.

    तानाजी सावंत म्हणाले की, पाहिलं आरक्षण मिळालं असताना ते रद्द झालं ते रद्द झाल्यानंतर वर्ष दोन वर्षे कोणी काही बोल नाही. आणि अचानक वादळ यावं तास आंदोलन कोण करतय? का करतय ? हे समजून घेण्यापेक्षा मराठी कुटुंबांना मदत करणं महत्वाचं आहे. आरक्षण मिळेल नाही मिळेल हा पुढचा भाग, पण ही मागणी अचानक का सुरू झाली हा ही प्रश्न आहेच, असं ते म्हणाले.
    मराठा-ओबीसी आरक्षणावरून मंत्री भिडले, शिंदे-फडणवीस चिडले, अधिकाऱ्यांना बाहेर पाठवून मंत्र्यांना झापलं
    २०१४ साली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. त्यानंतर या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेलं आणि तत्कालीन सरकारने योग्य भूमिका मांडली नाही? त्यांना आरक्षण का टिकवता आलं नाही असं थेट सवाल तानाजी सावंत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
    वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे गणित झाले सोपे, पाहा कोणाला सर्वात चांगली संधी..
    आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलो नाही, हा लढा आहे. काही बाबी कायदेशीर आहेत, असं तानाजी सावंत म्हणाले. आज एका पद्धतीने शासनाची दमछाक करून आताच्या आताच आरक्षण द्या, कागदावर लिहून द्या अशी भूमिका घेतली जात आहे. पण आरक्षण टिकलं पाहिजे ते महत्वाचं आहे, असंही ते म्हणाले. या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
    आदित्य ठाकरेंनी दुपारी प्रश्न मांडला, काही तासांतच एकनाथ शिंदेंकडून बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed