• Mon. Mar 16th, 2026
    कोस्टल रोडच्या कामाला गती, वरळी सीफेसची मार्गिका सात महिने राहणार बंद

    मुंबई : सागरी किनारी मार्गाच्या (कोस्टल रोड) पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी सी फेसवरील एका मार्गिकेची वाहतूक ४ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. वाहतूक विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. सी फेसच्या खान अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदूमाधव ठाकरे जंक्शन ते जे. के. कपूर जंक्शन, प्रभादेवीच्या दिशेने जाणारी ही मार्गिका आहे.

    किनारी मार्गाचे (कोस्टल रोड) काम वेगात सुरू असून, आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण १०.५८ किमीच्या कोस्टल रोड प्रकल्पात २ किमीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले असून, पहिल्या बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ रोजी, तर दुसऱ्या बोगद्याचे काम ३० मे रोजी पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोस्टल रोडची एक मार्गिका नोव्हेंबरपर्यंत सुरू करून प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू होता. तसे पालिका प्रशासनाकडून जाहीरही करण्यात आले होते. मात्र, शिल्लक कामावर परिणाम होणार असल्याने ही मार्गिका सुरू करण्याची प्रतीक्षा आणखी लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता मे २०२४ पर्यंत ही मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे.

    केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट, ठाणे-कोल्हापूरसह १५ शहरांत PM ई-बस सेवा, काय आहेत वैशिष्ट्यं?
    दरम्यान, प्रकल्पाच्या उर्वरित कामाला वेग देण्यासाठी खान अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदूमाधव ठाकरे जंक्शन ते जे. के. कपूर जंक्शनकडे जाणारी मार्गिका बंद ठेवून केवळ वरळी सी-लिंकवर जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून खान अब्दुल गफार खान उड्डाणपूल ते वरळी नाका-पोदार जंक्शन या मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यासोबतच बिंदूमाधव ठाकरे जंक्शनहून उजवीकडे वळल्यावर सर पोचखानवाला मार्ग येथून जे. के. कपूर जंक्शन येथे पोहोचता येईल, अशी माहिती वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

    शिवसेनेच्या बॅनरवर निलेश राणेंचा फोटो, सामंत बंधूंसोबत राजकीय वैर संपलं, कोकणात चर्चेला उधाण

    म्हणून रखडला प्रकल्प

    वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी समुद्रातील किनारी मार्गाच्या स्तंभांमधील अंतर वाढवण्याची मागणी केल्यामुळे ६० मीटरचे अंतर १२० मीटरपर्यंत वाढवण्यात आले. यामुळे मार्गाच्या कामात वाढ झाली. याशिवाय करोनाचा बसलेला फटका, न्यायालयीन कार्यवाहीत गेलेला वेळ यामुळे हे किनारी मार्गाची नोव्हेंबरची मुदत पाळणे शक्य झाले नसल्याचे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    बाळासाहेब ठाकरे गेले त्यानंतर तुमची मराठी संपली म्हणाऱ्याला दिली समज, व्हिडिओ व्हायरल

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed