• Mon. Aug 10th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील हवेची गुणवत्ता वाईट! पावसाने घेतला ब्रेक, खड्ड्यांमुळे सर्वत्र धूळ; एअर क्वालिटी इंडेक्स शंभरीपार

    Chhatrapati Sambhajinagar Air Pollution: पावसामुळे धूळ, माती; तसेच सर्व प्रकारचे धुलिकण खाली बसतात आणि त्यामुळे हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) कमी होतो. साहजिकच हवेतील प्रदूषण कमी होत नाही, पण हवेतील धुलिकण कमी झाल्यामुळे शहरवासीयांचा त्रास कमी होतो.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे आणि पुन्हा एकदा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) शंभरीपार गेला आहे. मुळात शहरभर खोदून ठेवलेले खड्डे, धूळ, माती, अस्वच्छता आणि अपेक्षित हिरवळ नसल्याने धुलिकण मोठ्या प्रमाणावर हवेत मिसळत आहेत. परिणामी, शहरवासीयांचा त्रास वाढत असल्याचे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

    एक्यूआय जुलै महिन्याच्या पहिल्या १५पंधरा दिवसांत दिसून आले आणि त्यामुळेच या काळात शहराचा एक्यूआय हा ५५ ते ७९ पर्यंत होता. जुलैच्या उत्तरार्धात काही अंशी कमी झालेल्या पावसामुळे दहा दिवस १०० ते ११६ पर्यंत गेला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांमध्ये कमी-अधिक पावसामुळे एक्यूआयमध्ये काहीअंशी घट झाली व हाच एक्यूआय ७९, ९०, ९५ पर्यंत होता. मात्र चार ऑगस्टपासून पुन्हा १०६, १०७, ११३, ११२ या प्रमाणे एक्यूआय सलग वाढत आहे. शनिवारी तो ११४ पर्यंत पोहोचल्याचे संकेतस्थळावरून स्पष्ट झाले.

    Maharashtra TimesMarathwada Farmers Death: शेतकरी कवटाळतोय मृत्यूला! मराठवाड्यात 8 महिन्यांत 570 जणांनी संपवलं जीवन, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक घटना?अर्धवट कामांचा फटका
    शहर परिसरात पाऊस कमी होताच हवेमध्ये खूप जास्त प्रमाणात धुलिकण मिसळून एक्यूआय लगेच शंभरच्या पुढे जात असल्याचे सातत्याने पाहायला मिळत आहे. ‘खरे म्हणजे हा खड्ड्यांचा व अर्धवट कामांचा परिणाम आहे,’ याकडे लक्ष वेधून पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सतीश पाटील म्हणाले, ‘मागच्या अनेक दिवसांपासून संपूर्ण शहरात वेगवेगळ्या कामांसाठी जागोजागी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत व अनेक दिवस खड्डे, माती, धूळ तशीच असते. त्यामुळे हीच माती, धूळ हवेत सतत मिसळत असते. त्याचाच परिणाम म्हणून एक्यूआय वाढलेला दिसतो.’

    Maharashtra TimesPune Crime : गावात रुबाबासाठी नको ते केलं! एअर फोर्सचा जवान सांगून वर्दी शिवायला, टेलरमुळे बिंग फुटलं; पुण्यात तरुणानं शहीद जवानाचं आयकार्ड वापरलंसद्यस्थितीत शहर परिसरात विविध रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्त्यांच्या आजा खोदन आजूबाजूलाही खोदून ठेवले आहे. पुन्हा किती तरी दिवस ही कामे सुरू असतात. त्यामुळे धूळ, माती सतत उडत असते. ही कामे वेळेत पूर्ण होण्याबरोबरच रस्त्यालगत झुडुपे; तसेच झाडी असणे गरजेचे आहे. त्याशिवाय सर्वच रस्त्यांची साफसफाई होणेही महत्त्वाचे वाटते.- मिलिंद गिरधारी, पर्यावरणप्रेमी

    धूळ, माती शोषून घेण्यासाठी पुरेशा प्रमाणात झाडांची गरज आहे. तुलनेने ही झाडी कमी प्रमाणात आहे. पुन्हा ठिकठिकाणी कामांसाठी केलेले खड्डे, माती, वाळू ही रस्त्यांलगत पडून असते. त्याचा परिणाम म्हणून हवेत धुलिकण जास्त प्रमाणात मिसळून एक्यूआय वाढतो, जो कमी करणे नक्कीच शक्य आहे.-डॉ. सतीश पाटील, पर्यावरणतज्ज्ञ

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा