• Sat. Sep 21st, 2024

महायुती सरकारने नवी मुंबई विमानतळाच नामांतर केलं-बावनकुळेंच वक्तव्य, मनसे आमदाराने सुनावलं

महायुती सरकारने नवी मुंबई विमानतळाच नामांतर केलं-बावनकुळेंच वक्तव्य, मनसे आमदाराने सुनावलं

डोंबिवली : मराठा आरक्षणानंतर आता नवी मुंबई विमान तळाच्या नामकरणाचा विषय समोर आला आहे. डोंबिवलीत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा नामकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. नवीमुंबई विमानतळ नामकरणाचा विषय प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे.यावरच मनसे आमदार राजू पाटील आपली प्रतिक्रिया देत आठवण करुन देत सांगितले की ठराव पास करून केंद्रात गेलेला आहे. नाव काय दिलेलं नाहीये, जाहीर करण्याची घाई करू नये, असे पाटील यांनी सांगितले. तर मनसे आमदार यांनी मुख्यमंत्री यांना विनंती करत सांगितले की तुम्ही आठवड्यातून दोन-तीनदा दिल्लीला जात असता. आमच्या दि.बा.पाटलांच्या नामकरणाचा विषय पेंडीग पडला आहे, तो जास्त न खेचता मार्गी लावावा.

डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याच्या व्हिडिओची आता चर्चा रंगू लागली आहे. डोंबिवली मधील फडके रोडवर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीचे सरकार आल्याबरोबर मंत्री रविंद्र चव्हाण आणि आमच्या सर्व लोकांनी मुंबईला जे नवीन विमानतळ होतंय त्याला दि.बा.पाटील साहेबांचं नाव दिलं म्हणून सर्वांनी भारतीय जनता पार्टीच स्वागत केलं. आता यावरूनच नवीमुंबई विमानतळाला नाव लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांचे कधी देणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

मनोज जरांगेंची आरपारची लढाई, मराठा आंदोलन तापलं, अमित शाहांनी फडणवीस, बावनकुळेंना दिल्लीत बोलावलं
दरम्यान, यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की मुख्यमंत्री यांना विनंती आहे, लवकर पाठपुरावा करून त्यांनी केंद्राकडून नाव डिक्लेअर करून घ्यावं. मुख्यमंत्री साहेबांना हेच सांगेल की दिल्लीला तुम्ही वाऱ्या करत असता तर थोडं या विषयाला देखील हात घाला,तुम्ही आठवड्यातून दोन-तीनदा दिल्लीला जात असता आमच्या दि.बा. पाटलांच्या नामकरणाचा विषय पेंडींग पडला आहे, तो जास्त न खेचता तो तिकडून कसा इथे हिवाळी अधिवेशनात किंवा इतर मार्गानं कसा लवकरात लवकर जाहीर होईल हे बघावं, असे पाटील यांनी सांगितले.त्यामुळे लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांचे नाव आतातरी नवी मुंबई विमानतळला दिले जाणार याची उत्सुकता नवी मुंबईकरांना लागली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे

भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीचे सरकार आल्याबरोबर मंत्री रविंद्र चव्हाण आणि आमच्या सर्व लोकांनी मुबंईला जे नवीन विमानतळ होतंय त्याला दि. बा.पाटील साहेबांचं नाव दिल म्हणून सर्वांनी भारतीय जनता पार्टीच स्वागत केलं.

Navi Mumbai: उपायुक्त गेठे यांची तडकाफडकी बदली; अतिक्रमणांविरोधात केली होती कारवाई

मनसे आमदार काय म्हणाले

अजून नाव दिले नाहीये. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे तो दोन्ही सभागृहात मंजूर, ठराव पास करून केंद्रात गेलेला आहे. नाव काय दिलेलं नाहीये, जाहीर करण्याची घाई करू नये. तो अधिकार संबंधित मंत्रालय राखून ठेवावा त्याचबरोबर मी त्यांचा अभिनंदन ही करेन. अभिनंदन यासाठी करेल की हे आंदोलन भूमिपुत्रांनी छेडल त्याविषयी राजकीय पक्ष होते, ते बीजेपी असेल मनसे असेल इतर पक्ष होते.तेव्हाची शिवसेना सोडून सर्व पक्ष याच्यात उतरले होते. हा सर्व त्या पक्षाचा भूमिपुत्रांचा आणि आंदोलनाचा यश आहे.ते नाकारण्याचे काही कारण असू शकत नाही. दुसरी गोष्ट त्यावेळेस असले नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ह्याच्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता.

इथे दी.बा.पाटील साहेबांचे नाव दिले जाणार नाही हेच प्रयत्न त्यांनी केले होते, परंतु कर्म धर्म सहयोग ने किंवा नियतीचे खेळ म्हणा त्याच लोकांना जाता जाता आणि सत्तेत आल्यावर एकनाथ शिंदे यांना डिक्लेअर करावं लागलं. यामागे इथल्या भूमिपुत्रांनी केलेल आंदोलन दी.बा.पाटील साहेबाच्या कार्याचा महिमा आणि त्याला आणि बीजेपी आणि आमच्या सारख्या पक्षांनी दिलेली साथ आहे, हे निश्चित खरं आहे. परंतु अजूनही ते नाव आलं नाही हे खरंय त्यांना विनंती आहे असे राजू पाटील म्हणाले

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काळे झेंडे फडकवू नका, आंदोलक पेटले, घोषणांनी परिसर दणाणून सोडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed