• Fri. Mar 6th, 2026

    नीलेश राणे-सामंत बंधूंची बंद दाराआड चर्चा, सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत महत्त्वाचा निर्णय?

    नीलेश राणे-सामंत बंधूंची बंद दाराआड चर्चा, सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत महत्त्वाचा निर्णय?

    रत्नागिरी: भाजपाचे युवा नेते रत्नागिरीचे माजी खासदार नीलेश राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबई येथे सोमवारी भेट घेतली आहे. यावेळी उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे देखील उपस्थित होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरणोत्सव भैया सामंत हे इच्छुक आहेत. यापूर्वी नीलेश यांचे धाकटे बंधू असलेले आमदार नितेश राणे यांनी किरण सामंत यांनी भाजपामध्ये यावे, असे विधान करत लोकसभेची जागा भाजपची आहे, असे म्हटले होते. भाजपाचे युवा नेते माजी खासदार नीलेश राणे आणि उदय सामंत यांचे पूर्वी फार सख्य नव्हते. राणे यांच्या मागच्या पराभवात हातभार असलेल्या सामंत यांच्याजवळ आता एकमेकांशी बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर जुळवून घेतले आहे. माजी खासदार नीलेश राणे यांचा रत्नागिरी जिल्ह्यात असलेला कायमच असलेला मोठा संपर्क पाहता लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांची भूमिका महत्वाची मानली जाते. त्यामुळे आज नाराजी नंतर पुन्हा सक्रिय झालेले व सामंत भेटीनंतर पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर येत असलेले राणे काय बोलणार, कोणती भूमिका मांडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

    Nilesh Rane: राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा

    सोमवारी मुंबई येथे झालेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही भेट कोकणाच्या विकासासाठी असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी बंददाराआड तासभर ही चर्चा झाल्याची माहीती मिळत आहे. पण या भेटीमुळे सामंत आणि राणे यांच्यातील दुरावा आता संपल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे सामंत राणे यांच्यातील दुराव्याच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण ऊर्फ भैय्या सामंत यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. रत्न सिंधू योजनेचे सदस्य असलेले किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी पालकमंत्री उदय सामंत हेही अनुकूल आहेत मात्र महायुतीकडून ही जागा कोणासाठी सोडली जाते याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र, सामंत व राणे या भेटीमुळे किरण सामंत यांच्या लोकसभा उमेदवारीचा मार्ग अधिक प्रशस्त झाल्याचे बोलले जात आहे. अशातच आता १ नोव्हेंबर रोजी सकाळी भैय्या सामंत यांच्या फेसबुक पेजला निलेश राणे व उदय सामंत यांच्या भेटीचा फोटो शेअर करत एका कार्यकर्त्याने कोण कोणाला गाडणार, हे आता स्पष्ट झालंय असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप नेत्यांचे या मतदार संघात मनोमिलन झाल्याचे असून राणे व सामंत एकत्र आल्याचे संकेत दिले आहेत.

    पेल्यातले वादळ- नीलेश राणे

    निलेश राणे यांनी गेल्या आठवड्यात राजकारणात मन रमत नाही, असं म्हणत राजकारणातून जय महाराष्ट्र करत निवृत्ती जाहीर केल्याने कोकणाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्याजवळ चर्चा केल्यावर त्यांची नाराजी दूर झाली.यानंतर निलेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वागतानंतर आता दोन नोव्हेंबर रोजी गुरुवारी निलेश राणे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आता राणे- सामंत यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे रत्नागिरी जिल्हा दौर्‍यात कोणती भूमिका मांडतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिल आहे.

    २००९ ते २०१४ या कालावधीत नीलेश राणे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यानंतर त्यांचा दोन वेळा पराभव झाला. मात्र तरीही त्यांचा या लोकसभा मतदार संघात असलेला संपर्क विकास कामांमध्ये असलेल्या सहभाग सक्रिय राहिला आहे.त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाला असून लांजा, राजापूर, रत्नागिरी येथेही निलेश राणे यांच्या स्वागताची भाजपा पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

    निलेश राणेंची नाराजी दूर, सिंधुदुर्गात झळकले ‘टायगर इज बॅक’चे पोस्टर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed