• Sat. Sep 21st, 2024
यंदा राज्यात असमाधानकारक पाऊस; सणासुदीत पाणीटंचाईचे चटके, टँकरच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर: यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पाण्याची दाहकता वाढली आहे. तहानलेल्या गावाच्या संख्येत वाढ झाल्याने छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात टँकरच्या संख्येत वाढ करावी लागली. या दोन्ही जिल्ह्यातील १०४ गावे व २५ वाड्यांना १२४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क, कलम १४४ लागू, कारण…
अपवाद वगळता यंदा विभागात सर्वदूर पुरेसा पाऊस झाला नाही. ऐन पावसाळ्यात अनेक भागातही अनेक जिल्ह्यात टँकर सुरु होते. विभागातील नांदेड, बीडसह अन्य जिल्हे टँकरमुक्त झाले असले तरी छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यात उन्हाळ्यापासून सुरु असलेले टँकर आजही सुरु आहे. उलट त्यात दिवसागणित वाढ होत असल्याचे चित्र आहे. १९ सप्टेंबरच्या दरम्यान या दोन्ही जिल्ह्यातील ८६ गावे व २५ वाड्यांना १०७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. तर सध्या १०४ गावे व २५ वाड्याना १२४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६ गावे व १९ वाड्याना ८४ टँकरद्वारे तर जालन्यातील २६ गावे व १९ वाड्यांना ४० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या प्रयत्नामुळे पोटदुखी; शिंदेंची ठाकरेंवर टीका

पैठणमध्ये ३१ टँकर :-
धरण उशाशी अन् कोरड घशाला अशी परिस्थितीत पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. जायकवाडी धरण या तालुक्यात असून देखील यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने पैठण तालुक्यातील २४ गावे व ५ वाड्याना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ३१ गावांना २५ टँकरद्वारे, फुलंब्रीत ८ गावांना ९ टँकरद्वारे, गंगापुर तालुक्यातील ७ गावांना ७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. यासह कन्नड ३, वैजापुरातील २ तर सिल्लोड तालुक्यातील ४ गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासह जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील ७, बदनापुर तालुक्यातील १७, भोकरदन १०, मंठा १ आणि घनसावंगी तालुक्यातील तहानलेल्या १० गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

रवींद्र टाकसाळ यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed