• Sat. Sep 21st, 2024

तुम्ही चर्चेला या-मराठे तुम्हाला अडवणार नाही, माणुसकी समजत नसेल तर उत्तर ‘मराठा’ आहे : जरांगे

तुम्ही चर्चेला या-मराठे तुम्हाला अडवणार नाही, माणुसकी समजत नसेल तर उत्तर ‘मराठा’ आहे : जरांगे

अंतरवाली सराटी : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अवधी संपल्यावर अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती बरीच खालावली आहे. आज रविवारी जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगेनी उपचारास नकार दिला असल्याने जरांगेंच्या प्रकृतीवर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. मला बोलता येतंय, तोपर्यंत चर्चेला या, नंतर काही फायदा होणार नाही, असा संदेश त्यांनी सरकारला दिला आहे. त्याचवेळी माणुसकी समजत नसेल तर उत्तर ‘मराठा’ आहे, असं सांगायला देखील जरांगे विसरले नाहीत.

आज दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपण मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणासाठीचा आंदोलनाचा दुसरा टप्पा शांततेत सुरू आहे. मी आता मागे हटणार नाही, आमच्या समाजातील लेकरांवर होणारा अन्याय आता सहन होत नाही. क्षत्रियांनी रडायचे नसते, लढायचे असते. आंदोलन सुरु असेपर्यंत माझ्या कुटंबाला माझ्यासमोर आणू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. आता माझा समाजच माझ्यासाठी पहिला आहे. मी आधी समाजाचा आहे, त्यानंतर कुटंबाचा आहे. मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवावे. मला काहीही होणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, असा पक्का निर्धारही जरांगे यांनी व्यक्त केलाय.

Manoj Jarange: महाजनांचा फोन, जरांगेंनी स्पीकरवर टाकला; सर्वांसमोरच टोकाचे बोल; भावनिक अस्त्राने महाजन निरुत्तर
मराठा आरक्षणावरची चर्चा मीडियाच्या कॅमेरासमोर होत नसते, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. “त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो? तुम्ही चर्चेला या.. मराठे तुम्हाला अडवणार नाही असे मी म्हणालो आहे. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही”.

पोटात पाण्याचा थेंबही नाही, डोळ्यांवर ग्लानी, बोलताना धाप; उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती कशी?
आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा, बाकी वळवळ करू नका

आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे मंत्री तानाजी सांवत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का सांगत नाहीत? त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली.

प्रत्येक गावात उद्यापासून साखळी आमरण उपोषण सुरु करा; मनोज जरांगे पाटलांच्या मराठा बांधवांना आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed