• Thu. Mar 12th, 2026
    राजकारणात काही सांगता येत नाही पण अजितदादा मुख्यमंत्री होतील, धर्मरावबाबा आत्राम प्रचंड आशावादी

    नागपूर: लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असले तरी नियमित वेळापत्रकानुसार अद्याप ७ महिने वेळ आहे. त्यानंतर ४ महिन्यांनी विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. ही वस्तुस्थिती असले तरी, महायुती आणि महाआघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव शुक्रवारी समोर आले.
    साधूंच्या वेशात चार आतंकवादी असल्याची रेल्वे हेल्पलाइनवर पोस्ट, चौघांना ताब्यात घेतलं, पालघरात नेमकं काय घडलं?
    मी पुन्हा येईल, हे समाजमाध्यमात व्हायरल होताच महायुतीतील दोन्ही पक्षात अस्वस्थता पसरली. नव्याने मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली. यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी कुठलीही उत्सुकता दाखवलेली नाही. भाजपचे बरेच नेतेही संयम बाळगून आहेत. आगामी काळात फडणवीस यांना मुख्यमंत्री करू, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक त्यांनाच कायम ठेवण्यात यावे, यासाठी प्रयत्नशील आहेत.

    विधानसभेचे ६२ मतदारसंघ असलेल्या विदर्भात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची किती शक्ती आहे, याची उभय गटाच्या वरिष्ठांना कल्पना आहे. शिवसेनेचे भलेही तीन खासदार असले तरी, भाजपच्या बळावर निवडून आल्याची जाणीव बहुतांश नेते नाकारत नाही. सत्तेचा मार्ग विदर्भातून जात असल्याने भाजपने खास ‘स्ट्रॅटेजी’ तयार केली. याउलट राष्ट्रवादी आणि शिवसेनेने या भागाकडे अपेक्षित लक्ष दिले नाही. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना बळ दिले नाही. अशा स्थितीत आता अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा विडा उचलला.

    सी सेक्शन प्रसूती, पोलीस आईने बॉडी बिल्डिंगमध्ये केलं महाराष्ट्रांचं प्रतिनिधित्व

    देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काल ट्विटरवर आले होते मी पुन्हा येईल, हे भाजपने मागे घेतले. यावर आता जास्त बोलण्यात अर्थ नाही. प्रतिक्रिया देणे अयोग्य होईल, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, यादृष्टीने आम्ही कामाला लागले आहोत, असे सांगून आत्राम यांनी, राजकारणात काही सांगता येत नाही पण, दादा मुख्यमंत्री होतील, असा पूर्ण विश्वास आहे, अशी माहिती सांगितली. महायुतीत अधिकाधिक जागा मिळाव्या आणि मिळाल्यावर निवडून येणे गरजेचे आहे. दादांच्या नेतृत्वाखाली संघटन बळकट करण्यात येणार आहे. ते राज्यभर दौरा करतील. विदर्भात मी देखील कामाला लागलो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    २००२ ते २०१९ पर्यंत देशात प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या दुर्घटना घडल्या, हा योगायोग नव्हे: कुमार केतकर
    आमच्याकडे ५३ जागा आहेत. आणखी ४० जागा मागणार आहोत. ९५ जागांपर्यंत आमची मागणी राहील. जागांबाबत नेते मंडळी काय ठरवतील, त्यानुसार सूत्र ठरेल. आमच्या वाट्याला येणाऱ्या सर्व जागा निवडून आणण्याचे आमचे प्रयत्न राहतील, असेही आत्राम यांनी सांगितले. अधिक आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री असा कुठलाही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता असल्याने सध्या तरी यात बदल होतील असे वाटत नाही. आमच्या गटाच्या एकच विचार अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, असेही धर्मरावबाबा आत्राम यांनी ठामपणे सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed