• Sat. Sep 21st, 2024

कॅन्सर शेवटच्या टप्प्यात जगण्याची इच्छा कायम, ५९ वर्षीय कल्पनाताईंची प्रेरणादायी संघर्षकथा

कॅन्सर शेवटच्या टप्प्यात जगण्याची इच्छा कायम, ५९ वर्षीय कल्पनाताईंची प्रेरणादायी संघर्षकथा

पुणे : कॅन्सरचा आजार म्हंटल की मृत्यू असं समजलं जातं, परंतु अशा अवस्थेत देखील एखाद्या व्यक्तीची जगण्याची उमेद जर असेल तर मृत्यू देखील काही काळ थांबू शकतो. अशीच एक ५९ वर्षीय महिला गेल्या पंधरा वर्षांपासून कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत आहे. आतापर्यंत त्यांचे ५० पेक्षा अधिक केमो झालेले असून त्यांना अंडाशयाचा कॅन्सर आहे. या अवस्थेत देखील ही महिला शेतातील, घरातील सर्व कामे करून हसत खेळत जीवन जगत आहे. आज त्या कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र, आपण जाणार हे माहीत.असूनही हसत खेळत जगणं हे खरच सर्वांसाठी प्रेरणा देणार आहे. त्या महिलेचे नाव आहे कल्पना विश्वनाथ घुले. खरंच त्यांच्या या प्रचंड इच्छा शक्तीला आणि सकारात्मकतेला सलाम करावा लागतो. मृत्यू डोळ्यासमोर दिसूनही त्या कधीही डगमगल्या नाही. अशा या नवदुर्गेच्या इच्छाशक्तीला सलाम करावा तेवढा थोडाच आहे.

कॅन्सर सारख्या आजाराचे असंख्य रुग्ण आपण पाहतो. त्यांना घ्यावे लागणारे उपचार, त्या उपचारतूनच माणूस तो व्यक्ती खचून जातो. कॅन्सरमध्ये केमो थेरिपी हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. चार ते पाच केमो केल्यानंतर रुग्ण घायाळ होतो किंवा त्याला आपला जीव गमावावा लागतो. मात्र, आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द येथील कल्पना घुले या महिलेचे तब्बल ५० पेक्षा अधिक केमो झाले आहेत. त्या महिलेची प्रचंड इच्छा शक्ती आणि जगण्याची उमेद असल्याने ती आताही कुणी म्हणणार देखील नाही की या महिलेला कॅन्सर आहे.
दूध उत्पादकांची दसऱ्यातच दिवाळी! संघाची शेतकऱ्यांना मोठी भेट; दोनशे कोटींचा बोनस जाहीर
चांडोली येथे राहणारे घुले कुटुंब. त्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय विश्वनाथ घुले आणि कल्पना घुले यांचा ४० वर्षांपासूनचा संसार मात्र संसार वाढत होता, मुले मोठी होत होती. मात्र नियतिला जणू हे मान्य नव्हते. कल्पना घुले यांना अंडाशयाचा कॅन्सरचे निदान झाले. सुरुवातीला पोटात पाणी होत आहे, थोड्या उपचाराने ते निघून जाईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, जेव्हा त्रास होण्यास सुरुवात झाली .त्यानंतर त्यांना कॅन्सरचे निदान झाले. साधारण ६ जुलै २०१० मध्ये त्यांना कॅन्सर या आजाराचे निदान झाले. २०१० मध्ये सुरुवातीला त्यांचे १२ केमो आणि ऑपरेशन केले. त्यानंतर आठ वर्ष त्रास जाणवला नाही. मात्र ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांना पुन्हा त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांना पिंपरी चिंचवड येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचे आतापर्यंत ५० केमो थेरिपी झालेल्या आहेत.
Soyabean Rate : सोयाबीनच्या किरकोळ दरात वाढ, आठवड्यात कसे राहिले दर, जाणून घ्या सविस्तर
आपल्या घरातल माणूस आज ना उद्या आपल्या डोळ्यासमोर नसणार हे माहिती असून देखिल घरातील सदस्य त्यांना त्या महाभयंकर आजाराची आठवण देखील होऊ देत नाहीत. मात्र, घरातील सकारात्मक वातावरण, त्यांची स्वत:ची असलेली प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी या केमो थेरपी वर मात करत आनंदाने जगत आहेत. घरातील सर्व कामात मदत करत आहेत. पहिल्यापासून असलेली कामाची आवड त्यांना एका जागेवर स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे त्या आजही घरात, शेतात सर्व कामे करत आहेत. आज त्यांचा कॅन्सर शेवटच्या स्टेपला आहे. मात्र त्यांची जगण्याची उमेद ही सर्वानाच प्रेरणा देऊन जाणारी आहे. खरच त्यांच्या या प्रचंड इच्छा शक्तीला आणि सकारात्मकतेला सलाम.
भारताच्या १०० धावा झाल्यावर सामना का थांबवला, जाणून घ्या मैदानात नेमकं घडलं तरी काय…

कुटुंबाचा विरोध बाजूला सारला अन् १६ वर्षांपासून सांभाळतेय एसटी दुरुस्तीची धुरा

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed