• Sat. Sep 21st, 2024

टोकाचं पाऊल उचलू नका, आई वडिलांचा, मुलांचा विचार करा, एकनाथ शिंदे यांचं मराठा समाजाला आवाहन

टोकाचं पाऊल उचलू नका, आई वडिलांचा, मुलांचा विचार करा, एकनाथ शिंदे यांचं मराठा समाजाला आवाहन

मुंबई : मराठा कुटुंबातील मुलांनी आत्महत्या करणं आमच्यासाठी दु:ख देणारी वेदणा देणारी घटना आहे. आत्महत्या झाल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, सर्व प्रयत्न करत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही. आम्हाला काही बाबी सुप्रीम कोर्टात मांडता आल्या नाहीत. काही त्रुटी होत्या, मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करायला अपयश आलं. आम्ही क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केलेली आहे. आम्ही क्युरेटिव्ह पिटीशन ऐकतो, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांसमोर आपले तज्ज्ञ वकील पुरावे सादर करतील. मराठा आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी संधी निर्माण झालेली आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी असणारांना दाखले देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती काम करत आहे. त्याचं देखील युद्ध पातळीवर काम सुरु आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा बांधवांना आवाहन करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. मराठा समाजातील तरुणांचा जीव इतका स्वस्त आहे का? आपल्या कुटुंबाचा विचार केला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
IND vs NZ LIVE Score: न्यूझीलंडचा निम्मा संघ बाद झाला- कुलदीपने घेतली पाचवी विकेट
मराठा समाजाला सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून लाभ दिले जातात त्याची माहिती देण्यासाठी मराठवाड्यात शिबीरं घेत आहोत. मराठा समाजाच्या बांधवांना मी आवाहन करतो, की मी कुणालाही खोटं आश्वासन दिलेलं नाही, मी कुणाची फसवणूक केलेली नाही. मी राजकीय आयुष्यात जे बोललो ते केलेलं आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यायची जबाबदारी घेतलेली आहे. आमचं सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूचं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
जरांगेंना पाठिंबा देत भाजपला सोडचिठ्ठी, पुण्यातील बड्या नेत्याचा रामराम, शिंदे पवारांवर टीका
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे करायचं आहे ते करणार आहे. कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका, आई वडिलांचा, मुला बाळांचा विचार करा, तुमची तुमच्या कुटुंबाला गरज आहे. आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार बांधील आहे. अधिसंख्य पदं देण्यासाठी मी पुढं आलो होतो. अडीच ते चार हजार विद्यार्थी काम करत आहेत. जे जे लाभ द्यायचे आहेत ते युद्ध पातळीवर कसे मिळतील यासाठी सरकारनं निर्णय घेतलेला आहे. टोकाचं पाऊल उचलू नका, ते समाजाला आणि परिवाराला न परवडणारं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
रविंद्र जडेजाच्या एका चुकीमुळे भारताला मॅच गमवावी लागू शकते; पाहा ११व्या षटकात नेमके काय झाले

मराठा आरक्षणासाठी सुनील कावळेंनी जीव गमावला, विनोद पाटलांची मराठा बांधवांना कळकळीची विनंती

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed