• Tue. Mar 17th, 2026

    न्याय देणार नसाल तर २०२४ आमच्या हातात, गुलाबराव पाटलांना कुणी दिला इशारा, काय घडलं?

    न्याय देणार नसाल तर २०२४ आमच्या हातात, गुलाबराव पाटलांना कुणी दिला इशारा, काय घडलं?

    जळगाव: न्याय देणं तुमच्या हातात आहे, न्याय द्यायचा नसेल तर तस सांगा पण विसरू नका २०२४ ची निवडणूक मग आमच्या हातात आहे,असा इशारा जळगावातील कोळी बांधवांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे. जळगावात गेल्या काही दिवसांपासून कोळी समाजाचं आंदोलन सुरु आहे. मागण्या मान्य होत नसल्याने आक्रमक झालेल्या कोळी समाज बांधवाने मंत्री गुलाबराव पाटील यांना इशारा दिला. यावर
    पाटील यांनी आंदोलकां आम्ही काय तुमचे दुश्मन आहे का? तुम्ही आम्हाला दुश्मन समजाताहेत, असं म्हटलं. कोळी समाज बांधवांचे उपोषण सोडवण्यासाठी आलेल्या मंत्री गुलाबराव पाटलांसमोर समोरच कोळी समाज बांधव पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आदिवासी कोळी बांधवासंदर्भात आदिवासी कोळी बांधवांच्या मागण्या संदर्भात बैठक झाले त्यात सकारात्मक चर्चा झाली आज उपोषण सोडवण्यासाठी मध्ये गुलाबराव पाटील जळगावात आंदोलनस्थळी पोहचले. मात्र सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसल्याने कोळी समाज बांधव आक्रमक झाले.

    आम्हाला न्याय देणं…तुमच्या हातात आहे पण..विसरू नका..२०२४ ची निवडणूक आमच्या हातात आहे, असा थेट इशारा आंदोलन स्थळी असलेल्या एका कोळी समाज बांधवाने मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला.
    हार्दिकच्या जागी भारतीय संघात होणार मॅचविनरची एंट्री, मोठ्या सामन्यापूर्वी रोहितची चिंता मिटली
    आक्रमक झालेल्या या कोळी समाज बांधवाला उद्देशून आम्ही काय तुमचे दुश्मन आहे का…दोन तीन वेळा मी भेट दिली. आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे परत तुमच्या मागण्या संदर्भात पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय काढला जाईल आणि तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असा आश्वासन यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं.
    मुंबई इंडियन्सचा खेळाडू ठरणार भारतासाठी कर्दनकाळ, सामन्यापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली…
    गेल्या अकरा दिवसांपासून जात प्रमाणपत्र मिळण्यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी बांधवांचं अन्न त्याग आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी उपोषणकर्त्यांची प्रकृती सुद्धा दिवसेंदिवस खालावत आहे. मात्र, शासनाकडून प्रशासनाकडून मागण्या संदर्भात कुठलाही निर्णय होत नसल्यानं कोळी समाज बांधव आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतरही कुठलाही तोडगा ना निघाल्याने मात्र आजही कोळी समाज बांधवांच आंदोलन सुटलं नाही.
    छगन भुजबळांना येवल्यात मोठा धक्का, मराठा आरक्षणावरून माजी सभापती जयदत्त होळकरांचा राजीनामा, कारण…

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed