रोहित पवारांनी प्रत्येक विभागाला कंत्राटी भरती अनिवार्य करण्याचं पाप कुणी केलं? तहसीलदार, शिक्षक, आरोग्यसेवक यांसारखी अनेक कायम पदं कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय कुणी घेतला? असा प्रश्न विचारला
कंत्राटी भरतीला व्यापक स्वरूप कुणी दिलं? गांभीर्याच्या नावाखाली परीक्षा शुल्काच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची लूट कुणी सुरू केली? पेपरफुटी विरोधात कडक कायदा करण्यास टाळाटाळ कोण करतंय?, असे प्रश्न देखील रोहित पवार यांनी विचारले आहेत.
मा. फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब…
कंत्राटी भरतीचं खापर आधीच्या सरकारवर फोडणं म्हणजे दिड वर्षांपासून सत्तेत असलेल्या स्वपक्षाच्या नाकर्तेपणावरच एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे.
प्रत्येक विभागाला कंत्राटी भरती अनिवार्य करण्याचं पाप कुणी केलं? तहसीलदार, शिक्षक,… pic.twitter.com/WgjmHrGUbW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 20, 2023
कंत्राटी भरतीचा निर्णय कुणाच्या काळात झाला, कुणाचं पाप आहे, कुणी माफी मागावी यात राज्याच्या युवा वर्गाला अजिबात स्वारस्य नाही. युवा वर्गाला केवळ शाश्वत नोकरी हवीय. त्यामुळं अडीच लाख रिक्त पदांची भरती कधी करणार यावर बोला!, असं पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, पण तरीही तुम्ही हा विषय छेडलाच आहे तर एक सांगतो, कंत्राटी भरतीचा पहिला शासन निर्णय (GR) 2 जून 1998 रोजी झाला. त्यामुळं पाप… माफी… याबाबत आपण स्वतःच अंतर्मुख होऊन चिंतन करण्याची गरज आहे.…आणि या सर्वांना जर तुमचंच सरकार जबाबदार असेल तर राज्यातल्या तमाम युवांची नाक घासून माफी अर्थातच तुम्हीच मागायला हवी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपकडून देखील उद्या राज्यभरात कंत्राटी भरतीला मविआ सरकारला जबाबदार धरत आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मविआला प्रश्न विचारले आहेत. आता रोहित पवार यांनी १९९८ च्या जीआरचा फोटो प्रसिद्ध करत बावनकुळे यांना देखील सवाल केले आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News