म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये आज, सोमवारी आणि उद्या, मंगळवारी असे दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान ३३ ते ३४ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता असून बुधवारपासून कमाल तापमानाचा पारा पुन्हा एकदा चढू शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक बसू शकतो. केवळ मुंबईच नाही, तर देशातही ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान जाणवण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
रविवारी मुंबईत सांताक्रूझ येथे ३४.६, तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. शनिवारपेक्षा कमाल तापमानात किंचित घट होती. तसेच सांताक्रूझ केंद्रावर संध्याकाळच्या वेळेस आर्द्रतेत घट होऊन ५९ टक्के आर्द्रता नोंदली गेली. त्यामुळे दिवसभरात शनिवारच्या तुलनेत कमी उकडले. मात्र पुन्हा सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस आभाळ ढगाळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा वाढू शकतो. या वातावरणानंतर बुधवार, १८ ऑक्टोबरपासून तापमानाचा पारा पुन्हा चढू शकतो. १८ आणि १९ ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३५ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. या काळात आभाळ निरभ्र असेल, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. कोकण आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक जाणवेल, असा इशारा खुळे यांनी दिला.
रविवारी मुंबईत सांताक्रूझ येथे ३४.६, तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. शनिवारपेक्षा कमाल तापमानात किंचित घट होती. तसेच सांताक्रूझ केंद्रावर संध्याकाळच्या वेळेस आर्द्रतेत घट होऊन ५९ टक्के आर्द्रता नोंदली गेली. त्यामुळे दिवसभरात शनिवारच्या तुलनेत कमी उकडले. मात्र पुन्हा सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस आभाळ ढगाळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाडा वाढू शकतो. या वातावरणानंतर बुधवार, १८ ऑक्टोबरपासून तापमानाचा पारा पुन्हा चढू शकतो. १८ आणि १९ ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३५ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. या काळात आभाळ निरभ्र असेल, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. कोकण आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक जाणवेल, असा इशारा खुळे यांनी दिला.
उत्तरेकडे राजस्थानच्या वायव्य टोकावर स्थित पश्चिमी झंझावात व दक्षिणेत तमिळनाडू स्थित चक्रीय वाऱ्यांची स्थिती या प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे १७ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, नाशिक छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्यानंतर १८ ऑक्टोबरपासून ऑक्टोबर हिटचा प्रभाव राज्यात जाणवेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. यंदा केंद्राने संपूर्ण देशातच ऑक्टोबर हीटचा प्रभाव अधिक असेल असा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कमाल तापमान वाढण्याची शक्यता असून कमाल तापमान २ अंशांनी अधिक असू शकते.