• Thu. Mar 12th, 2026
    बर्थडेचा केक कापायला आला नाही, मित्रावर चाकूने सपासप वार, उल्हासनगरमधील थरारक घटना

    उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला असून एका तरुणाने त्याच्या मित्राची क्षुल्लक कारणारून हत्या केली आहे. वाढदिवसाला केक कापायला आला नाही म्हणून रागाच्या भरात त्याने मित्रावर चाकूने सपासप वार केले.

    उल्हासनगरमधील खेमानी परिसरातील देशमुख नगरमध्ये जेवण करून बाहेर घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी आलेला तरुण प्रदीप वर्मा याच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी करण्यात आले होते. त्यांनतर त्याला उल्हासनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, दरम्यान आज तब्बल १३ दिवसानंतर त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

    घरकाम करणाऱ्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार, शरीरावर सिगारेट-गरम तव्याचे चटके, आरोपींना कारागृहातून अटक
    जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा मयताच्या कुटुंबाने घेतला आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परवेश ठाकूर आणि विशाल वर्मा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चौकात केक कापण्यासाठी न आल्याने त्याचा राग मनात धरून ह्या दोघांनी प्रदीप वर्मा ह्याच्या पोटात चाकू भोसकून त्याला गंभीर स्वरूपात जखमी केल्याचे मृतकाच्या वडिलांनी सांगितले होते.

    लातूरच्या काँग्रेस पदाधिकारी हत्याकांडाचा साडे नऊ वर्षांनी निकाल, आरोपींना जन्मठेप आणि सक्तमजुरीची शिक्षा

    घटनेतील आरोपी हा अल्पवयीन असून त्यातील एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. एवढे दिवस होऊनही पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली नसल्याने प्रदीपच्या वडिलांनी जोपर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात येत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि त्याचे अंत्यसंस्कार देखील करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    राज ठाकरेंच्या आदेशानंतर बीडमध्ये मनसैनिकांचा राडा; टोल नाक्यावरील बॅरिकेट्स तोडत आक्रमक पवित्रा

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed