यामध्ये कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, गुटखा पान शाळेजवळ विकणे गुन्हा आहे. १०० यार्डात टपरी नसावी असे शासकीय आदेश पाळले जात नाही व शाळाही आग्रह धरत नाहीत. आमच्या सीताराम सारडा विद्यालय शेजारी ४० वर्षे अशी पानटपरी होती. मी तिथे येताच रितसर अतिक्रमण विरोधी पथकाला पत्र दिले. त्यांनी येऊन ती टपरी काढली. टपरी मालक येताच त्याला शासकीय नियमाचा आदेश दाखवला. आमच्या पोटाचे काय ? या प्रश्नावर इतरांचे जीवघेणे पदार्थ विकणाऱ्याच्या पोटाची काळजी करायला शाळा नसते हे उत्तर दिले.
इतर गाड्या,फ्लेक्स ही काढले. अनेकजण चारचाकी गाड्या शाळेच्या भिंतीला पूर्णवेळ पार्क करत होते. शाळा काय करील ? हा शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन असतो. वाहतूक शाखेकडे पत्र देताच त्यांनी गाड्यांना दंड करताच गाड्या लगेच निघाल्या. व्यसनाला विरोध करण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टीही महत्वाच्या आहेत, असेही कुलकर्णी यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
त्यावेळी कुलकर्णी यांच्या या कारवाईचे स्वागत झाले होते. इतर शाळांकडून आणि प्रशासनाकडूनही अपेक्षा व्यक्त केल्या जाऊ लागल्या होत्या. दुर्दैवाने त्यापूर्वीच कुलकर्णी यांच्यावरच हल्ला झाला. त्यामुळे आता कुलकर्णी काय भूमिका घेणार आणि या कारवाईचे पुढे काय होणार याची उत्सुकता होती. यावरही कुलकर्णी यांनी आता उत्तर दिले आहे. जखमा बऱ्या झाल्याने उद्यापासून शाळेत जाणार असून आपण सुरू केलेला हा संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पोलिसांनी कुलकर्णी यांना पोलिस संरक्षण देऊ केले होते. एक दिवस त्यांच्या घराजवळ पोलिस दिसले. मात्र, नंतर पुन्हा संरक्षण काढून घेण्यात आल्याचे दिसून आले. यावर निर्भय बनो चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत पोलिस अधीक्षकांकडे कुलकर्णी यांना बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली आहे. स्वत: कुलकर्णी यांनी मात्र त्याची अवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.
Read Latest Ahmednagar News and Marathi News