• Tue. Mar 10th, 2026
    महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांना पावासाचा अलर्ट, पुढचे ३-४ तास वादळी वाऱ्याचा इशारा

    मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी महत्त्वाच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खरंतर, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज रविवार असून नागरिकांनी दिवसभरात घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

    हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३-४ तासांमध्ये अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.

    Maharashtra Weather Forecast : राज्यासाठी २४ तास धोक्याचे; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
    हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, कोकण, रत्नागिरी, रायगड, ठाणे, या जिल्ह्यांना २७ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये शुक्रवारपासूनच पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतं. अशात आजही पुण्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे तर कोकण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढच्या ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहे.

    रस्ते पाण्याखाली, बस डेपो पाण्यात; नागपुरात पावसाचा तडाखा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed