• Sun. Mar 8th, 2026
    नागपूर पुरात बुडाले, देवेंद्र फडणवीसांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी!

    नागपूर : शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अर्धे शहर पाण्यात बुडालेले दिसून आले. लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलेले दिसत होते. आंबाझरी तलाव आणि नाग नदीच्या आसपासच्या भागात सर्वाधिक नुकसान झाले. रविवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूरबाधित भागातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी लोकांशी संवादही साधला. मात्र, त्यांना पीडितांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

    पुरामुळे सर्वाधिक नुकसान अंबाझरी लेआउट, डागा लेआउट आणि वर्मा लेआउटमध्ये झाले आहे. या भागात सहा फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे घरातील सर्व सामान खराब झाले. पुरातून वाहत असलेला चिखल घरांमध्ये शिरला. रविवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी बाधित भागात पोहोचून लोकांची भेट घेतली. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्र्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

    Maharashtra Weather Forecast : राज्यासाठी २४ तास धोक्याचे; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

    लोकांनी उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी नेले आणि पुरामुळे झालेले नुकसान दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघू लागल्यावर महिलांनी त्यांना अडवले. पुरामुळे झालेले नुकसान आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत महिलांनी उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार केली. महिला तक्रारी करत राहिल्या, तर उपमुख्यमंत्री गप्प राहून सर्वांचे म्हणणे ऐकून घेत होते. त्यानंतर फडणवीस यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.

    परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, पूर टाळता आला असता!

    नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामागचे कारण काय आहे, हे समजले आहे. ते पुढे म्हणाले, “ही परिस्थिती टाळता आली असती. आंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटपासून ते नाग नदीपर्यंतचे सर्व अडथळे स्वच्छ केले असते, तर असे झाले नसते.”

    ‘पायाभूत सुविधा सुरुवातीपासून तयार केल्या जातील’

    नाल्यावरील अतिक्रमणाच्या बांधकामावर फडणवीस म्हणाले, “शिवाजीनगरची स्केटिंग रिंग २०-२५ वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. आजपर्यंत इतका पाऊस पडला नाही की, त्यामुळे ही बाब समोर आली नाही, पण आता ही बाब समोर आली आहे. स्केटिंग रिंगचे पार्किंग हे एका नाल्यावर बांधले आहे, त्यामुळे वरून पाणी वाहत आहे, त्यामुळे त्याला तोडले जाईल. यासोबतच नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती टाळता येईल,” असंही देवंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed