• Sat. Mar 14th, 2026

    कुटुंब संपवण्याचा डाव, सासुरवाडीत घुसून पत्नी, मेव्हणा, आजेसासूची हत्या, अहमदनगरात खळबळ

    कुटुंब संपवण्याचा डाव, सासुरवाडीत घुसून पत्नी, मेव्हणा, आजेसासूची हत्या, अहमदनगरात खळबळ

    शिर्डी: कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना शिर्डी परिसरात सावळीविहीर येथे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. यात पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पत्नी सतत माहेरी जायची. आपल्या संसासारत सासूरवाडीच्या मंडळीचा हस्तक्षेप वाढत आहे. या संशायवरून आणि रागातून जावयाने हे कृत्य केल्याची माहिती आहे. जो दिसेल त्याच्यावर तो चाकून वार करीत होता. यामध्ये सहा जण जखमी झाले. तर वर्षा निकम, रोहित गायकवाड आणि हिराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला. आरोपीचा संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा डाव असल्याचं त्याच्या कृतीतून दिसून येते. घराचा दरवाजा उघडताच तो दिसेल त्याच्यावर वार करत सुटला होता.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीजवळ सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली. प्राथमिक महितीनुसार आरोपीने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासू अशा तिघांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. तर या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. दरम्यान, कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे.

    वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजे सासू, वय ७०) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगिता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी संशयित सुरेश निकम याला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शिर्डी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमकं काय घडलं?

    सावळीविहीर येथील वर्षा गायकवाड हिचा विवाह संगमनेर खुर्द येथील सुरेश निकम याच्याशी झाला होता. काही काळाने दोघांमध्ये कायम किरकोळ कारणामुळे वाद होत होते. वाद झाला की वर्षा ही माहेरी निघुन जायची. त्यामुळे, आपल्या संसारात सासू-सासरे, मेव्हणी, मेव्हणा यांचा हस्तक्षेप वाढत चालल्याचा त्याला राग होता. वर्षाने संगमनेर पोलिस ठाण्यात पतीविरूद्ध तक्रारही दिली होती. त्यानंतर ती सावळीविहीर येथे निघुन गेली होती.

    आरोपी सुरेश याने फोन करुन बोलावणे केले होते. मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बुधवारी (२० सप्टेंबर) आरोपीने रोशन निकम याला घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास सावळीविहिर गाठली. दार वाजवल्यावर कुटुंबीयांनी दार उघडलं. तेव्हा निकम याने लगेच दिसेल त्याच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. पत्नी वर्षा पुढे आली तर तिच्यावरही त्याने हल्ला केला. निकम यांने एकापाठोपाठ एक सहा जणांवर वार केले. यात पत्नी वर्षा निकम, मेव्हणा रोहित गायकवाड आणि आजेसासु हिराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला. मेव्हणी योगिता गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड व सासू सांगिता गायकवाड हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी निघून गेले.

    ही घटना पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांना समजली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीसही रवाना झाले. गुरूवारी पहाटे पोलीस पथके संगमनेर येथे दाखल झाली. आरोपींच्या घरी जाऊन माहिती घेतली मात्र ते घरी नव्हते. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन मुख्य आरोपी संतोष निकम व रोशन निमक यांना नाशिक येथून अटक केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed