• Sat. Sep 21st, 2024
वाहत्या नाल्यातून दोरीच्या साहाय्याने नेली अंत्ययात्रा, नंदुरबार जिल्ह्यातील भयानक वास्तव

नंदुरबार : अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या नाल्यातून ग्रामस्थ दोरीच्या साहाय्याने जीव मुठीत धरून अंत्ययात्रा नेण्याची वेळ आली आहे. अंत्यविधीसाठी तब्बल १५ तास वाट पहावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातून समोर आला आहे. ८ तारखेला गावात धावजी उखाराव नाईक या व्यक्तीचं अल्पशा आधाराने निधन झालं होतं. त्यावेळी त्यांची अंत्ययात्रा चक्क वाहत्या नाल्यातून न्यावी लागली.

नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस असल्यामुळे वागदे गावालगत नाल्याला पूर आला. येथील धावजी नाईक हे अल्पशा आजाराने मयत झाले. त्यांचा अंत्यसंस्कार १५ तास करता आला नाही शनिवारी पाण्याच्या जोर कमी झाल्याने ग्रामस्थांनी नाल्यातून चार फूट खोल पाण्यातून दोराच्या साहाय्याने मला जीव मोठे धरून स्मशानभूमी गाठली. नंदुरबार जिल्ह्यातील आजही अनेक गावांमध्ये रस्ते आणि पूल नसल्यामुळे आदिवासी बांधवांना मृत्यूनंतर देखील मरणयातना भोगाव्या लागत आहेत.

बहिणीचे लचके तोडणाऱ्या हरामखोराला फाशीच घ्यावी लागली, जितेंद्रच्या आत्महत्येनंतर कोपर्डीतील नागरिक काय म्हणाले?
नवापूर तालुक्यातील वागदे येथील धावजी उघड्या नाईक यांचे शुक्रवारी दिनांक ८ तारखेला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी वागदे गावालागत नाला ओलांडून नाल्याच्या पलीकडे जावे लागणार होते. स्मशानभूमी ही नाल्याच्या पलीकडे असल्याने त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात असतात. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. वागदे गावाजवळ असलेल्या नाल्यात देखील पावसाच्या पाण्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. १५ तासानंतर शनिवारी पाण्याचा जोर कमी झाल्याने धावजी नाईक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

नवापूर तालुक्यातील धनराज कोतवाल फळीत अशाच पद्धतीने नदी ओलांडून अंत्यविधी करावा लागतो. त्याचप्रमाणे वागदे गावातही दिसून आले. अशा अनेक समस्या आजही प्रशासनाकडून सुटलेल्या नाहीत हे यावरून दिसून येते. नंदुरबार जिल्ह्यात १९८ ग्रामपंचायतींमध्ये स्मशानभूमी आहेत. तर ४४० ग्रामपंचायतींमध्ये स्मशानभूमी नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर नवापूर तालुक्यात ११६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २१ ग्रामपंचायतीत स्मशानभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांना धावजी नाईक यांची अंत्ययात्रा नेण्यासाठी नाल्यातून दोर लावून जावे लागले. यावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नवापूर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

IND vs PAK मध्ये पुन्हा हायव्होल्टेज लढत; फ्रीमध्ये कुठे पाहाल लाइव्ह? हे आहे योग्य चॅनेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed