अॅड. डमाळे यांनी सांगितले, राळेगणसिद्धी येथील हजारे यांच्या समाज सेवी साम्राज्याचा उत्तराधिकारी नेमण्याबाबत विनंती करण्यासाठी मागच्या आठवड्यात महाराष्ट्र जनजागृती मंचचे शिवराम पाटील, जळगाव सैनिक समाज पार्टीचे ईश्वर मोरे, सैनिक समाज पार्टीचे कार्याध्यक्ष तुकाराम डफळ, प्रदेश सचिव अरूण खिची व मी अॅड. डमाळे प्रदेशाध्यक्ष म्हणून हजारे यांना राळेगण सिद्धी येथे भेटलो. त्यावेळी शिवराम पाटलांनी हजारे यांना उत्तराधिकारी नेमणुकीबाबत प्रश्न विचारला असता हजारे वर आकाशाकडे बोट करून परमेश्वर ठरवील तसे होईल, असे उत्तर दिले. त्यावेळी, अण्णा आपल्या कार्याला चंद्र-सूर्य असेपर्यंत आयुष्य लाभावे अशी देशातील सज्जन आणि समाजसेवी प्रवृत्तीच्या नागरिकांची परमेश्वरांकडे प्रार्थना आहे, असे त्यांना भेटलेल्या या माजी सैनिकांनी स्पष्ट केले.
अण्णांनी आपल्या हयातीत समाजसेवी प्रवृत्तीच्या लोकांकडे त्यांच्या सामाजिक कामाची जबाबदारी सोपविली पाहिजे. त्यांनी जबाबदारी सोपविण्यास उशीर केला तर, शासन आणि प्रशासनातील भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक त्यांच्या सामाजिक साम्राज्याचे लोचके तोडल्याशिवाय राहाणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन विचारधारेला गालबोट लागल्या शिवाय राहाणार नाही. या विषयावर आम्ही हजारेंशी चर्चा केली. आपण माजी सैनिक आणि शेतकरी कुटुंबातील आहात. जय जवान-जय किसान या लालबहादूर शास्त्रींच्या स्लोगनला सन्मान देऊन आपण जागतिक कीर्तीचे समाजसेवक असा नावलौकिक मिळविला आहे. आपण आयुष्यभर भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन केले आहे. आपण समाजसेवेच्या मार्गाने भ्रष्टाचाऱी प्रवृतीच्या लोकांना धडा शिकवला आहे. आपल्याच या विचारधारेला शिरसावंद्य मानून सैनिक समाज पार्टीची स्थापना राजकारणाच्या मार्गाने भ्रष्टाचार मुक्त व वंशवादी मुक्त भारत निर्माण करण्यासाठी झालेली आहे. निवृत्त कर्नल बलबीरसिंह परमार यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन व अनेक वेळा आपली भेट घेऊन आणि मार्गदर्शन घेऊन सैनिक समाज पार्टीचे रजिस्ट्रेशन केले आहे, असेही डमाळे यांनी हजारे यांना सांगितले. त्यावर हजारे यांनी समाधान व्यक्त करून सैनिक समाज पार्टीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. मात्र उत्तराधिकारी नियुक्तीस नकार दिला.
हजारे यांनी त्यांच्या हयातीतच उत्तराधिकारी नेमावा व सैनिक समाज पार्टीवर ही जबाबदारी सोपवावी म्हणून त्यांच्याकडे नियमितपणे पाठपुरावा केला जाणार आहे. या कार्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून अॅड. डमाळे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल (निवृत्त) बलबीर सिंह परमार, कृषी मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रीधर दरेकर, महाराष्ट्र प्रभारी कमांडो (निवृत्त) ईश्वर मोरे, उपप्रदेशाध्यक्ष कॅप्टन (निवृत्त) अरूण कदम (युध्दवीर, लढाईत एक पाय गमावला आहे), मिडिया प्रमुख विठ्ठल शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. सुनीता झिंजुर्डे (छत्रपती संभाजीनगर), प्रदेश सचिव अरूण खिची, कार्याध्यक्ष तुकाराम डफळ, अहमदनगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब भुजबळ प्रयत्न करणार आहेत, असेही अॅड. डमाळे यांनी सांगितले.