• Sun. Jun 7th, 2026
    काकू आमची आई बेशुद्ध पडलीय, लवकर या! चिमुरड्यांचा आक्रोश; अन् आत प्रवेश करताच दृष्य पाहून सर्वच हादरले

    जळगाव: खानदेशचे ग्रामदैवत असलेल्या कानुमातेच्या उत्सवासाठी आपल्या गावी गंगापूर येथे आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विद्युत वजन काट्याचा शॉक लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी धरणगाव शहरात घडली आहे. भारती घनश्याम पाटील (रा. गंगापुरी ता. धरणगाव), असे मयत विवाहितेचे नाव आहे.
    आई वडील कामाला गेले; चिमुरडा घरी एकटाच, खेळता खेळता पडला बाहेर, अन् पुढे घडलं त्यानं गाव हळहळलं
    मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम रायभान पाटील हे आपली पत्नी ४ वर्षाची मुलगी आणि १० वर्षाच्या मुलासह सुरत येथे वास्तव्यास आहेत. कानबाईच्या उत्सवासाठी ते आपल्या परिवारासह गावी आले होते. रविवारी सकाळी ते आई-वडिलांसोबत शेतात भेंडी तोडायला गेले होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरात भारतीबाई यांच्या लहान मुलांनी रडत-रडत आरडा ओरडा करायला सुरुवात केली. मावशी, काकू आमची आई बेशुद्ध पडलीय, लवकर या. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या संगिता संजय पाटील यांनी घरात जाऊन पाहिले असता भारती पाटील ह्या जमिनीवर पडलेल्या होत्या.

    रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाची नाती महत्वाची, प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

    हाका मारल्यानंतर काहीजण आले. त्यांनी पाहिले असता भारती पाटील यांच्या हातात ईलेक्ट्रीक वजन काट्याची ईलेक्ट्रीक पीन होती. विजेच्या धक्क्यामुळे भारती पाटील ह्या बेशुद्ध पडल्याचे लक्षात आले. गावकऱ्यांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी धरणगाव पोलिंसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर शिंदे हे करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed