• Sun. Jun 7th, 2026
    राष्ट्रवादीतील फूट अन् बारामती लोकसभेची जागा, जानकर मनातलं बोलले; निवडणुकीबद्दल म्हणाले…

    बारामती : ‘राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देशभर जनस्वराज्य यात्रा काढून ५४३ लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढवणार आहे. पक्षाच्या पार्लमेंट कमिटीकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली आहे. मात्र कमिटीने अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. महाराष्ट्रातून बारामती, माढा आणि परभणी या तीन जागांची मी मागणी केली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये मी भेद करत नाही. काँग्रेस सत्तेत असतानाही त्यांनी मित्र पक्षांचे असेच हाल केले. भाजपही सत्तेत असल्यावर असंच करणार. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसवर नाराज न राहता आपली ताकद वाढवली पाहिजे. मोठा मासा छोट्या माशाला खात असतो, म्हणून राष्ट्रीय समाज पक्षच मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही जनस्वराज्य यात्रा काढली आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी बारामती पत्रकारांशी बोलताना दिली.

    पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, ‘घराणेशाही संपवून सामान्य माणूसही या देशाचा मालक झाला पाहिजे. हाच हेतू ठेवून देशात राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार आणण्यासाठी देशभरात राष्ट्रीय पक्षाच्या वतीने जनस्वराज्य यात्रा काढली आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी ही यात्रा काढून मतदारांना शेतकरी, युवक, युवती यांना जागृत करून जनतेचे राज्य आलं पाहिजे. या हेतूने मागील दीड महिन्यांपासून विठ्ठलाला साकडं घालून जनस्वराज्य यात्रा काढली आहे.’

    INDIA Meet : लोगोचं अनावरण, नव्या मित्रांची एंट्री, इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीचं वेगळेपण काय? जाणून घ्या

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीबाबत विचारले असता जानकर म्हणाले की, ‘पवार साहेब आणि सुप्रिया ताई म्हटल्या की, अजित पवार आमचे नेते आहेत. मला असं वाटतं की या दोघांचं म्हणणं एकच असेल. या दोघांच्या भांडणात लक्ष न घालता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा राष्ट्रीय समाज पक्षाने घेतला पाहिजे,’ असं आवाहन जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed