• Sat. Sep 21st, 2024

जळगावात पुन्हा’लम्पी’ची साथ, बळीराजाचे गोधन धोक्यात, कधी होणार लसीकरण?

जळगावात पुन्हा’लम्पी’ची साथ, बळीराजाचे गोधन धोक्यात, कधी होणार लसीकरण?

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘लम्पी’ आजाराची साथ सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात गोवंशाची एकूण पाच लाख ७८ हजार जनावरे असून, आगामी चार दिवसांत उर्वरित सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पशूसंवर्धन उपायुक्त शशिकांत पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा, अंमळनेर व धरणगाव तालुक्यात ‘लम्पी’चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यात १७५ पशूधनाच्या आयुष्यावर ‘लम्पी’चे संकट उभे ठाकले आहे. ‘लम्पी’वर नियंत्रण मिळविण्यासाठी झालेल्या आढावा बैठकीत पशूसंवर्धन उपायुक्त शामकांत पाटील यांनी अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेश होईपर्यंत सातही तालुक्यातील गुरांचे भरणारे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात व अन्य राज्यातून होणारी पशूधनाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यासाठी पोलिस व आरटीओ प्रशासनाने आंतरराज्य सिमेवर कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

पैसे नाही, डोळ्यांसमोर जनावरं मरतायत, कृषीमंत्र्यांकडून दखल नाही; सत्तारांचा तालुका ‘रेड झोन’मध्येच

तालुकानिहाय मृत जनावरे

धरणगाव -०१

पारोळा -०७

एरंडोल -०८

पाचोरा -०५

चाळीसगाव-५२

भडगाव-०६

अमळनेर-०१

एकूण -७९

मोहटादेवीच्या दर्शनाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, ८ महिन्यांच्या बाळासह दोघांचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed