• Sat. Sep 21st, 2024

कांद्यानंतर केंद्र सरकार कशाबद्दल वेगळा निर्णय घेणार, शरद पवारांनी शेतकऱ्यांना सतर्क केलं

कांद्यानंतर केंद्र सरकार कशाबद्दल वेगळा निर्णय घेणार, शरद पवारांनी शेतकऱ्यांना सतर्क केलं

पुणे : तत्कालीन केंद्रातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांसमोर असणारे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी हितासाठी ७६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता, असं शरद पवार म्हणाले.सध्या शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, लोकांना काम द्या, जनावरांना चारा द्या, पाणी द्या या सर्व गोष्टींच्या आवश्यकता आहे, त्याची जबाबदारी राज्यकर्त्यानी गांभीरपणे घेतली पाहिजे हा आमचा आग्रह आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

शरद पवार आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट संचलित सवाई मंगल कार्यालय लोकापर्ण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, माजी मंत्री शशिकांत शिंदे हे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज माफ केले पाहिजे. केंद्र सरकार साखरे बाबत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यामुळे उसाला योग्य भाव देता येणार नाही. सरकारचं हे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही त्यासाठी एकसंध राहुन अनुकूल धोरण राबवणे गरजेचे आहे. सध्या कांद्याचा प्रश्न निर्माण झाला. राज्यातील सत्ता ज्यांच्या हातात आहे. त्यांना या बद्दल किती आस्था आहे हे न बोलले बरं, असा टोला शरद पवार यांनी लगावला.शेतीतील पिंकाना रास्त किमंत द्या यासाठी शेतकरी रस्तावर बसत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्या मालाला दर देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही पवार म्हणाले..
Chandrayaan-3 : विक्रम लँडरनं टिपलेला व्हिडिओ इस्त्रोकडून शेअर, चांद्रयानाचं काम कसं सुरु, नवी अपडेट समोर
मुख्यमंत्री असताना पंढरपूर, जेजुरी, कोल्हापूर, तुळजापूर, बुलढाणा, शेवगावसह अनेक मंदिराचा चेहरा बदलण्याची खबरदारी घेत दरवर्षी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केल्याने या सुसज्ज मंदिरांमध्ये विविध सोयी उपलब्ध झाल्या. असेही पवारांनी सांगितले.
Express Train : प्रवाशांसाठी खूशखबर: एक्स्प्रेस गाड्यांना ८ स्थानकांवर नव्याने थांबे; कुठे, किती वेळ थांबणार?
वीर धरणातील पाण्यामुळे पुरंदर,इंदापूर, बारामती भागातील अनेक शेती क्षेत्र बागायती झाली हे वीर धरणाचे उपकार शेतकरी कधी विसरणार नाही. पाऊस नाही धरणात पाणी नाही यासाठी सरकारने पाउले उचलणे महत्त्वाचे आहे. आपल्या काळात पाणी चारा नसल्याने छावण्या काढल्या पिण्याच्या पाण्यासाठी टैंकरने पाणी दिले. बागायती भागात झांडाना पाणी देण्यासाठी निधी दिला,असेही पवारांनी यावेळी सांगितले..
आवडत्या ठिकाणी बदली, कॉन्ट्रॅक्टर्सकडून डीजेने स्वागत; पण सरकारी अधिकाऱ्याला थेट निलंबनाचा दणका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed