• Thu. Mar 12th, 2026
    धक्कादायक…! मुलगा व्यसनाच्या आहारी; वडिलांनी फटकारले, रागातून तरुणाचे टोकाचे पाऊल

    रत्नागिरी: अलीकडे युवावर्गात व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिवापर आदेश अनेक कारणांमुळे दुर्दैवी घटना घडल्याचे अनेकदा पाहायला मिळत आहे. एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोकणातील राजापूर तालुक्यात भू गावातील कुंभारवाडी येथे घडली आहे. या तरुणाने व्यसनावरून झालेल्या भांडणातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऋषिकेश सुरेश कुंभार असे या युवकाचे नाव आहे.
    बीड हादरलं! पतीच्या डोक्यात शिरले संशयाचे भूत; घेतला टोकाचा निर्णय, अन् घडलं धक्कादायक कृत्य
    मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यात भू गावातील कुंभारवाडी येथे राहणारा ऋषिकेश सुरेश कुंभार याला दारूचे व्यसन होते. त्या दारूच्या व्यसनावरून त्याचे ६ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेनंतर घरी वडिलांजवळ भांडण झाले होते. वडिलांजवळ झालेल्या भांडणाचा डोक्यात राग धरून त्याने टोकाचे पाऊल उचलले. रागाच्या भरात त्याने विषारी औषध प्यायले. बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्यायल्याने एकच खळबळ उडाली. अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेशला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मदत करून तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

    मुंबईत वसतिगृहात तरुणीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपीनं स्वतःच जीवनही संपवलं

    मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला तातडीने मुंबईला नायर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ऋषिकेश लाँचवर मासेमारीचे काम करायचा. अशातच आपल्या घरातील मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबातून आणि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई येथील नायर रुग्णालयातील वॉर्ड नंबर २१ मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना ऋषिकेश याचा मुंबई येथे नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अवघे २२ वर्षे वय असलेल्या या युवकाने टोकाचे पाऊल उचलत विष पिऊन आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सगळ्या प्रकाराची नोंद मुंबई येथून राजापूर पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed