• Sat. Sep 21st, 2024
Onion Market Crisis: टोमॅटोचा दिलासा, तर कांद्यांमुळे डोळ्याला धार; बाजारात भाव तब्बल…

नागपूर : मागील महिनाभर चेहरा लालबुंद करण्यास भाग पाडणाऱ्या टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांवर आलेला असतानाच कांद्याचा दर प्रतिकिलो २० रुपयांवरून ४० रुपयांवर गेला आहे. एकाचे दर कमी होत नाही तोच दुसऱ्याचे दर वाढण्याच्या या प्रकाराने ग्राहकांची अवस्था हसावे की रडावे, अशी झाली आहे; असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

संपूर्ण जुलै महिन्यात टोमॅटोचे दर अक्षरश: गगनाला भिडले होते. प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत दर गेला होता. त्यामुळे सामान्यांच्या जेवणातून टोमॅटो जवळपास गायब झाला होता. अनेक खानावळी, भोजनालये, हॉटेले, रेस्टॉरंट्समध्ये सॅलडमध्ये टोमॅटो देणे बंद करण्यात आले होते. यंदा टोमॅटोचे उत्पादन घटल्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसला. नागपूरनजीकच्या गावांमध्ये पावसाळ्यात टोमॅटोचे उत्पादन घेण्यात येत नाही. त्यामुळे नागपुरात नाशिक, संगमनेर, औरंगाबाद आणि बेंगळुरूतील मगनपल्लीहून टोमॅटोची आवक सुरू होती. तर बेंगळुरू येथे यंदा टोमॅटोचे उत्पादन समाधानकारक झाले नव्हते. त्यामुळे चढ्या दराने टोमॅटोची विक्री सुरू होती.

कांद्यावरुन वातावरण तापताच धनंजय मुंडेंनी थेट दिल्ली गाठली, पण फडणवीसांनी जपानमधून फोन करुन विषयच संपवला
सामान्य नागरिकांना यामुळे बसत असलेला आर्थिक मार लक्षात घेत सरकारने यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर हळूहळू टोमॅटोचे दर कमी झालेत. आता बाजारात प्रतिकिलो ५० ते ६० रुपये दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे. मात्र, टोमॅटोचे दुखणे कमी होत नाही तोच कांद्याने डोके वर काढले आहे. कांद्याचा दर दुप्पट झाला आहे. मागील आठवड्यापर्यंत प्रतिकिलो २० रुपये दर असलेला कांदा आता प्रतिकिलो ४० रुपयांवर पोहोचला आहे. प्राप्त माहितीनुसार, येत्या काळात हा दर प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ज्याला कांदा परवडत नसेल तर त्याने दोन चार महिने कांदे खाल्ले नाही तर काय बिघडतं? | दादा भुसे

केंद्राच्या निर्णयाविरुद्ध रोष

देशभरात टोमॅटोंपाठोपाठ कांद्याच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. त्‍याचे परिणाम येत्‍या काही दिवसांत जाणवणार आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

शिंदेंच्या सांगण्याने कोश्यारींना मविआच्या १२ आमदारांची यादी परत पाठवली, राज्य सरकारची कबुली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed