• Sat. Sep 21st, 2024
Chhatrapati Sambhajinagar News LIVE : ज्येष्ठ शिवसैनिकाचा ठाकरेंना धक्का, शिंदे गटात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : माजी महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ सदस्य गजानन बारवाल यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

बारवाल १९८८पासून नगरसेवक आहेत. एका वेळी ते अपक्ष म्हणून निवडून आले. ते १९९६-९७ मध्ये महापौर झाले. मध्यंतरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, ते पुन्हा पक्षात परतले होते. बारवाल यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी आमदार संजय शिरसाट व पदाधिकारी उपस्थित होते.

‘पक्षाचा मी जुना नगरसेवक आहे. मध्यंतरी भाजपमध्ये गेलो; पण पक्षाची गरज लक्षात घेऊन पक्षात परतलो. माझ्याकडे पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले. न्याय दिला नाही, पक्षात कुचंबणा होत होती. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला. वॉर्डासह शहराचा विकास मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होईल,’ असा विश्वास बारवाल यांन ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

Sambhajinagar : आरोग्य विभागाने दिली चिंताजनक माहिती; शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

तिखट टाकून व्यापाऱ्याला गंडा

कोलगेट चौकात एका मल्टिसर्व्हिसेस दुकानातून तीस हजार रुपये खात्यावर ट्रान्स्फर करून पैसे न देता दुकानदाराच्या डोळ्यांत तिखट फेकून चोरटा पळाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेबाराला घडली. नंदकिशोर शंकरराव देशमुख असे नागरिकांनी पकडलेल्याने नाव आहे.

प्रवीण सरडे यांच्या दुकानात विविध रिचार्ज व खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले जातात. गुरुवारी दुपारी देशमुख तेथे आला. त्याने खात्यावर तीस हजार ट्रान्स्फर करण्यास सांगितले. व्यवहार होताच त्यावेळी देशमुख तिखट टाकून पळून गेला. सरडे यांनी आरडाओरड केली असता देशमुखला नागरिक अंकुश बोबडे, मधुकर देशमुख, केशव पाटील आदींनी पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. सरडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीशी मैत्री, तिघांनी तिला एकांतात बोलावलं, न्यूड फोटो काढले अन्…
दरम्यान, काही दिवसांपासून वाळूज महानगर परिसरातील व्यावसायिकांवर हल्ले, चोरी, बंदुकीच्या धाकावर लूटमार अशा प्रकारामध्ये वाढ झाली असून पोलिसांचा धाक कमी झाला आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. काही दिवसापूर्वी रांजणगावात एका सोन्याच्या दुकानातून सकाळी साडेदहाला साडेबारा लाख रुपयांची लूट झाली होती.

पाणी सोडण्याची मागणी

मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस तळ गाठत आहे. विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्या वेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. मराठवाड्यातील संभाव्य पाणीटंचाई पाहता समन्यायी पाणी वाटपाच्या मागणीने जोर धरला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळात बैठक घेऊन हक्काच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

MSRTC ST Bus: लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, Google Pay, Phone Pay ने एसटीच्या तिकीटाचे पैसे भरा
मराठवाड्यात पावसाची उघडीप कायम असल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ४२.६३ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात २२.५३ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात २१.७२ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ३६.८० टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा या नद्यांवरील २७ बंधाऱ्यात ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील एकूण ८७७ प्रकल्पात केवळ ३५.६९ टक्के पाणीसाठा आहे.

रोहित पवारांचा MPSC पोरांशी संवाद, व्यथा जाणून घेतल्या

पाऊस नसल्यामुळे धरणसाठ्यात वेगाने घट सुरू आहे. मोजक्याच प्रकल्पात पाणी असून बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला आहे. चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. पावसाची स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने धरणाचे पाणी आरक्षित केले आहे. जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील बहुतांश धरणे भरली आहेत. भाम, भावली, वालदेवी धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. दारणा ९२.९६ टक्के, मुकणे ७६, वाकी ५७.९०, गंगापूर ९०.४३ असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. भंडारदरा धरणात १०० टक्के आणि निळवंडे धरणात ८३.२० टक्के पाणीसाठा आहे. या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे. सध्या कमी प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. जायकवाडी धरणावर सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी शहरे अवलंबून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed