• Sun. Sep 22nd, 2024
नागपुरच्या पोराचा विदेशात डंका; पाणी बर्फासारखे थंड, जेलीफिशची भीती, तरीही इंग्लिश खाडीत पोहण्याचा विक्रम

नागपूर: मनात ध्येय ठेवून त्या दिशेने काम केले तर प्रतिकूल परिस्थितीतही आपण एकहाती यश मिळवू शकतो. याचे आदर्श उदाहरण नागपूर येथील २२ वर्षीय आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे याने दाखवले आहे. जयंतने आपल्या रिले टीमसह जगातील सात समुद्रात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या इंग्लिश खाडीत टू वे पोहण्याचा विक्रम केला आहे. इंग्लंड ते फ्रान्स आणि परत फ्रान्स ते इंग्लंड हे ७० किमीचे अंतर त्यांनी ३१ तास २९ मिनिटांत पूर्ण केले.
महापालिकेचे प्रभागाकडे दुर्लक्ष; नागरिकांची आमदारांकडे तक्रार, लोकप्रतिनिधीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक
जयंतचा दावा आहे की, ही कामगिरी करणारा आशियाई खंडातील तो पहिला संघ आहे. या मोहिमेने आशियाई विक्रमही केला आहे. या विक्रमासह महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे नाव आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणातही नोंदवले गेले आहे. माउंट एव्हरेस्ट हे गिर्यारोहकांसाठी आहे, तर इंग्लिश बे जलतरणपटूंसाठी आहे. जगातील ७ खाड्यांपैकी ही सर्वात महत्त्वाचा आणि अवघड खाडी मानली जातो. इंग्लंड ते फ्रान्स आणि फ्रान्स ते इंग्लंड हे ७० किमीचे अंतर आम्ही ३१ तास २९ मिनिटांत पूर्ण केले. आमचा संघ ही इंग्लिश खाडी पार करणारा आशियाई खंडातील पहिला संघ बनला आहे. जो टू वे रिले संघ आहे आणि नवीन आशियाई रेकॉर्ड सेट केले आहे.

या प्रवासात शारीरिक आणि मानसिक आव्हानांसोबतच निसर्गातील बदल हेही मोठे आव्हान होते. महासागराचे पाणी बर्फासारखे थंड होते. साधारणपणे १२ ते १५ अंश डिग्री सेल्सिअस थंड पाणी होते. पोहताना खूप जोरदार वारा सुरू होता. लाटा ओसळत होत्या आणि धुक्यात हरवून जाण्यासारखे वातावरणामुळे माझ्या टीम आणि माझी चुकामूक होणे यासह अनेक जलचरांचे अडथळे जलतरणपटूंना पार करावे लागतात. जेलीफिश किंवा नेटोरियन सी लायन सारखे जलचर माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. मला आनंद आहे की, मी त्याचा यशस्वीपणे सामना करू शकलो आणि हा विक्रम प्रस्थापित केला, असे जयंत दुबळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

सत्तेसाठी लाचारी, भुजबळ ओबीसी नेते राहिले नाहीत; विजय वडेट्टीवारांचा निशाणा

भरलेल्या स्विमिंग टँकमध्ये पोहणे आणि मोकळ्या जागेत किंवा समुद्रात पोहणे यात मोठा फरक आहे. या प्रवासादरम्यान माझे वडील डॉ. जयप्रकाश दुबळे हे माझे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संपूर्ण मोहिमेचे नियोजन केले. नागपुरात समुद्र नाही पण मी अंबाझरी तलावात सराव करून ती कसर भरून काढली. मी त्यात रात्री ६-१२ तास सराव केला. नंतर मला मुंबईत जुहू चौपाटीवर सराव करता आला. काही वर्षांपूर्वी आईचे निधन झाले. या दुःखद प्रसंगी मी माझ्या कुटुंबासह थकलो होतो. पण ते माझ्या आईचे स्वप्न होते. माझ्या २ बहिणी, आजी आणि माझे वडील जे गुरुसारखे आहेत त्यांनी मला धैर्य दिले. माझ्यात विश्वास निर्माण केला. या प्रवासात अनेक ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने मी हे यश मिळवले आहे. आज मी माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा मला खूप आनंद आहे, असे मत जयंत यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed