केतन अग्रवाल या तरुणाचं लग्न ठरलं होतं. तो खूप आनंदात होता. होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त तो तिच्यासह लोहगडावर ट्रेकिंगला आला. पण ट्रेकिंग करत असताना गडाच्या एका कड्यावरुन तोल जावून त्याचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबासह केतनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, लोणावळा : होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग आलेल्या तरुणाचा ट्रेकिंगचा आनंद घेताना तोल गेला. यामुळे त्याचा कड्यावरून सुमारे चारशे फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तरुणाला अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लग्नाची गाठ बांधण्यापूर्वीच मृत्यूने गाठलं. या घटनेमुळे संबंधित तरुणीसह तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना गुरुवारी (18 जून) सकाळी साडेदहा वाजता घडली.
केतन विशाल अग्रवाल असे लोहगडाच्या कड्यावरून दरीत पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. केतन हा अवघ्या 26 वर्षांचा होता. तो पुण्याच्या मावळ येथील गहुंजे परिसरातील लोढा बेलमोंडो सोसायटीत वास्तव्यास होता. केतनचं लग्न ठरलं होतं. पावसाळ्यानंतर त्याचं नोव्हेंबर महिन्यात लग्न आयोजित करण्यात आलं होतं. पण अचानक अशी दु्र्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हा तरुण त्याच्या होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्रेकिंगला गेला होता. तो होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी सकाळी त्याच्या कारने लोहगड येथे आला होता. केतन होणाऱ्या बायकोसोबत ट्रेकिंगला आला होता. त्यामुळे तो प्रचंड आनंदात होता. पण गडावरील कड्यावरुन अचानक तोल गेल्याने त्याचा दरीत पडून मृत्यू झाला.
केतन लोहगडावर ट्रेकिंगचा आनंद घेत होता. यावेळी गडावरील एका कड्यावरुन त्याचा तोल गेला. यामुळे सुमारे साडेचारशे फूट खोल दरीत तो पडला. या घटनेत केतन गंभीर जखमी झाला. इतक्या उंचावरुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलिस कर्मचारी पवन कराड, जय पवार, प्रशांत तुरे, प्रणय उकिरडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी केली. पोलिसांनी या घटनेची माहिती लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाला कळविली. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.
आदिती गायकवाड, वैष्णवी भांगरे, सचिन गायकवाड, विशालभाऊ पिसे, सागर दळवी, कुणाल कडू, सागर कुंभार, योगेश साखरे, सपना साखरे, समीक्षा साखरे, आर्यन साखरे, स्वप्निल मोकाशी, कैसर शेख, राजेंद्र कडू, योगेश दळवी, महेश मसणे, सुनील गायकवाड यांच्या पथकाने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर केतनचा मृतदेह लोहगड परिसरातील घनदाट झाडीतून मार्ग शोधत खोल दरीतून बाहेर काढून गडाच्या पायथ्याशी आणण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तळेगाव दाभाडे येथील शासकीय रुग्णालयात आणले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा