• Wed. Jun 17th, 2026
    वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; CSMT-शिर्डी, सोलापूर गाड्या  या स्थानकांवर थांबणार

    मुंबई: वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. रेल्वे बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या दोन गाड्यांना नवे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती मध्य रेल्वेने आज बुधवारी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत गाडी क्रमांक २२२२३/२२२२४ या गाडीला कल्याण स्थानकात थांबा दिला जाणार आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून ही गाडी शिर्डीसाठी निघाल्यानंतर सकाली ७ वाजून १६ मिनिटांनी कल्याण स्थानकावर पोहोचेल. तर शिर्डीवरून येताना रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी कल्याण स्थानकात पोहोचेल. सध्या या गाडीला दादर, ठाणे, नाशिक रोड या ठिकाणी थांबा आहे. ही गाडी सीएसएमटीवरून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी निघते आणि दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी शिर्डीला पोहोचते. तर शिर्डीवरून संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी निघते आणि रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचते.

    सीएसएमटी स्थानकावरून सोलापूरला जाणारी गाडी क्रमांक २२२२५/२२२२६ या गाडीला ठाणे स्थानकात थांबा दिला जाणार आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून निघाल्यानंतर ठाणे स्थानकात दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांनी पोहोचेल. तर सोलापूरवरून सीएसएमटी स्थानकाकडे येताना ही गाडी ठाणे स्थानकात रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. सध्या या गाडीला दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी येथे थांबा आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून दुपारी ४ वाजून ०५ मिनिटांनी निघते आणि सोलापूरला रात्री १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचते. तर सोलापूरवरून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी निघून सीएसएमटी स्थानकात दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते.

    CSMT ते शिर्डी आणि CSMT ते सोलापूर या दोन्ही गाड्यांचे नवे थांबे ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत, असे मध्य रेल्वेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

    साईबाबा मंदिर तर आवडलं पण बाबांचा महाप्रसादही ‘लय भारी’, राष्ट्रपतींकडून आचाऱ्यांना राजधानी दिल्लीचं निमंत्रण

    सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
    राज्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड – महासंवाद
    विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed