• Tue. Mar 17th, 2026

    पथदिव्यांच्या पोलचा शॉक लागला, लोकांना वाटले दारूडा पडलाय; ठाण्यात तरुणाचा हकनाक बळी

    पथदिव्यांच्या पोलचा शॉक लागला, लोकांना वाटले दारूडा पडलाय; ठाण्यात तरुणाचा हकनाक बळी

    ठाणे : रस्त्यावर पाणी साचले म्हणून फुटपाथ वरून जाणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कळवा पूर्वेतील न्यू शिवाजीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली. पथदिव्यांच्या (स्ट्रीट लाईट) पोल मधून चोरी केलेल्या केबलचा शॉक लागून या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा खुलासा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाला विजेचा झटका लागून रस्त्यालगत तडफडत असताना कोणी दारुडा दारू पिऊन पडला असावा असे समजून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र वेळीच त्याच्याकडे लक्ष दिले असते या कोवळ्या जीवाचा जीव वाचला असता. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली होती.

    एका १७ वर्षीय मुलाचा विद्युत झटका लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास कळवा पूर्वेतील न्यू शिवाजी नगर परिसरात घडली आहे. मंदार महेंद्र गौरी असे १७ वर्षीय मुलाचं नाव असून महापालिकेच्या स्ट्रीट पोलला लागून असलेल्या केबलचा शॉक लागून जागीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुवारी मुंबई ठाणेसह कळव्यात देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यात कळव्यातील न्यू शिवाजी नगर परिसर हा जलमय झाला होता. रस्त्यावर साचलेले पाणी बघून मंदार हा फुटपाथ वरून गेला असता त्याला विजेचा झटका बसून तो अचानक खाली कोसळला.

    दांपत्याने चुलत भावाला लोकेशन पाठवत शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बोलवले; समोरचे दृश्य पाहून बसला धक्का
    मंदार हा विजेच्या झटक्याने तडफडत असताना नागरिकांनी पहिले मात्र कोणीतरी मद्यपान करून पडला असेल म्हणून त्याच्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल.. मात्र बराच वेळाने तडफडत असलेला तरुण हा आपल्याच विभागातील मुलगा मंदार असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आल. त्यानंतर स्थानिकांनी मंदारला तात्काळ उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली होती.

    सायबर चोरट्यांनी पुण्यातील भारती सहकारी बँकेची एक कोटी रुपयांची फसवणूक; पाहा कसा डल्ला मारला
    दरम्यान स्थानिकांनी त्याच्या मृत्यूबाबत विद्युत पोलच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल महापालिकेला जबाबदार धरल आहे. तर रस्त्यावरील विद्युत पोल वरून तार टाकून विजेची चोरी केलेल्या वायरीचा शॉक लागून या तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासाअंती त्याचा मृत्यू कसा झाला आणि या प्रकरणात नक्की जबाबदार कोण? हे स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेत पालिका प्रशासन आणि नागरिकांचे दुर्लक्ष यामुळे एका निष्पाप कोवळ्या मुलाचा हकनाक बळी गेला हेही तितकेच खरे.

    पायपीट, प्रसूतीवेदना, पावसाचा सामना करत रुग्णालयात पोहोचली, मात्र महिलेचा करुण अंत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed