• Sat. Sep 21st, 2024

कलाप्रेमी राजकारणी, सेनेचे पक्षप्रमुख,मविआचे कॅप्टन, लढाऊ नेते उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रवास

कलाप्रेमी राजकारणी, सेनेचे पक्षप्रमुख,मविआचे कॅप्टन, लढाऊ नेते उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रवास

प्रबोधनकारांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जपण्याचं काम

प्रबोधनकारांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जपण्याचं काम

उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० मध्ये झाला. बालमोहन विद्यामंदिर आणि सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. रश्मी ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी असून त्यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे सध्या वरळीतून आमदार आहेत. उद्धव ठाकरे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडिलांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवत आहेत. (फोटो : शैलेश मुळे, मिड डे)

मुंबई महापालिकेत विजय ते कार्यकारी अध्यक्ष

मुंबई महापालिकेत विजय ते कार्यकारी अध्यक्ष

उद्धव ठाकरे यांनी १९९७पासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. मुंबई महानगरपालिकेच्या २००२ च्या निवडणुकीची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी महापालिकेत शिवसेनेची स्थापना करून दाखवली. इथूनच त्यांनी शिवसेनेत जम बसविण्यास सुरुवात केली. त्यानंतर २००३ मध्ये महाबळेश्वरच्या शिवसेनेच्या शिबीरात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणुन उध्दव ठाकरे यांची निवड झाली. याच्याच पुढच्या वर्षी २००४ मध्ये उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंनी उत्तराधिकारी घोषित केलं. (मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरचा फोटो)

​बाळासाहेंबांच्या निधनानंतर एकहाती पक्ष सांभाळला

​बाळासाहेंबांच्या निधनानंतर एकहाती पक्ष सांभाळला

बाळासाहेब ठाकरे यांचं नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत भाजपनं सेनेसोबतची युती मोडली होती. भाजपनं ऐनवेळी युती मोडल्यानं राज्यात शिवसेनेचं कसं होणार हा प्रश्न होता. कारण, भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा आक्रमक प्रचार करणारा नेता होता. हे असताना देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या एकट्याच्या बळावर ६६ आमदार निवडून आणत ताकद दाखवून दिली. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सत्ता राखण्यात यश आलं होतं. २०१४ पासून भाजप आणि शिवसेना यांचं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार राज्यात कार्यरत होतं, पण सेनेच्या मंत्र्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळं उद्धव ठाकरे दुखावलेले होते. २०१९ च्या लोकसभेचं महत्त्व लक्षात घेता भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर युतीची चर्चा करण्यासाठी आले होते. त्या बैठकीत युतीची घोषणा झाली. पण त्यातचं पुढे भाजप आणि सेना युतीच्या फुटीची बीजं रोवली गेली होती. (विधानपरिषद आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतरचा फोटो)

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मविआचे कॅप्टन

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि मविआचे कॅप्टन

महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. या आघाडीला नाव महाविकास आघाडी असं देण्याचं ठरलं. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी काम केलेलं असल्यानं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी भूमिका दोन्ही पक्षांकडून घेण्यात आली आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ पासून मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारचं नेतृत्व केलं. याशिवाय सरकार जाऊन एक वर्ष होऊन गेलंय तरी देखील तेच मविआचा राज्यातील चेहरा आहेत. मविआचे मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असले तरी कॅप्टन म्हणून जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर होती. शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन थाळी, राज्यात करोना काळात केलेलं काम, या बाबी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात जमेच्या ठरल्या.

आमदार, खासदार गेले, पक्षाचं नाव गेलं, आव्हानं कायम

आमदार, खासदार गेले, पक्षाचं नाव गेलं, आव्हानं कायम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांनी पक्षाची धुरा एकहाती सांभाळत ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या यशाची कमान सतत चढती ठेवली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप करत सेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सेनेचे ४० आमदार सोडून गेले. पाठोपाठ सेनेचे १३ खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयानं ठाकरेंकडून शिवसेना नाव आणि धनुष्य चिन्ह देखील गेले.

लढाऊ नेते अशी ओळख निर्माण

लढाऊ नेते अशी ओळख निर्माण

आता चिन्ह आणि नावाची लढाई सुप्रीम कोर्टात सुरु आहे. पण, उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या रामशास्त्री बाण्यावर विश्वास दाखवला असला तरी जनतेच्या कोर्टात जाऊन शिवसेना आपलीच असल्याचं दाखवून द्यायचं ठरवलंय. त्या दृष्टीनं त्यांनी जे आमदार सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात सभा देखील घेतल्या होत्या. शिवसेना पक्ष पुन्हा जनतेच्या, मतदारांच्या आणि प्रामाणिक शिवसैनिकांच्या जोरावर उभं करणं हे उद्धव ठाकरेंपुढील आव्हान आहे. सध्या ते इंडिया आघाडीचा भाग असून त्यांना तिथं महत्त्वाचं स्थान मिळणार असल्याचं बंगळुरुतील त्यांच्या भाषणातून दिसून आलं.

कलाप्रेमी उद्धव ठाकरे

कलाप्रेमी उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे कुटुंबवत्सल आहेत. मितभाषी आहेत, कलाप्रेमी आहेत, सुसंस्कृत राजकारणी आहेत आणि प्रचंड मेहनती व्यक्तिही आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या उद्धव ठाकरे यांचा एक फोटोग्राफर ते मुख्यमंत्री प्रवास थक्क करणाराच नव्हे तर तितकाच अचंबित करणाराही आहे. उद्धव ठाकरे हे देशातील नामवंत फोटोग्राफर पैकी एक आहेत. राज्याच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. तर ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या पुस्तकातून करण्यात आले आहे. (Instagram Grab : Uddhav Thackeray )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed